शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

भोजापूर धरणातून रबी हंगामासाठी आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

नांदूरशिंगोटे व परिसरात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तसेच भोजापूर धरण दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे कालव्याद्वारे धरणाचे पाणी ...

नांदूरशिंगोटे व परिसरात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तसेच भोजापूर धरण दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे कालव्याद्वारे धरणाचे पाणी पूर्व भागात पोहोचले होते. कालव्याच्या लाभक्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे रबी पिकांना आवर्तन देण्यासाठीची मागणी उशिराने झाली. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात भोजपूर धरणातून कालव्याद्वारे रबी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येते; परंतु यावर्षी इतिहासात प्रथमच फेब्रुवारी महिन्यात आवर्तन सोडण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ४ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती, तर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ फेब्रुवारी ही तारीख दिली होती. पाटबंधारे विभागाने मध्य साधून सोमवारी पाणी सोडले. भोजापूर धरणातून रबी हंगामासाठी पहिलेच आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन किमान वीस दिवस सुरू राहणार आहे. २०० दशलक्ष घनफूट पाण्याद्वारे ९०० हेक्टरवरील रबी पिकांना आवर्तनाचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने कालव्याची पाहणी केली आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रात अजूनही भूजल पातळी टिकून आहे. त्यामुळे सिंचनासाठी मर्यादित मागणी राहण्याची शक्यता आहे. रबीसाठी हे पहिलेच आवर्तन असल्याने धरणात पाणीसाठा शिल्लक राहून उन्हाळी आवर्तन देणेही शक्य होऊ शकेल. त्यादृष्टीनेही प्रशासनाचा विचार सुरू आहे.