शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

नाशकात लवकरच सायबर पोलीस ठाणे

By admin | Updated: March 31, 2017 00:49 IST

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे.

 नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यादृष्टीने मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वतंत्र सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.सिनिअर जर्नलिस्ट फोरमसोबत पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत शहरातील कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सिग्नल यंत्रणा, गुन्ह्यांची उकल आदि मुद्द्यांवर सिंगल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मुंबई, पाठोपाठ नाशिकमध्येही आर्थिक फसवणूक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून विविध प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे अधिकाधिक उघडकीस आणण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सिंगल म्हणाले. दरम्यान, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त जयंत बजबळे यांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम, मोहिमांची माहिती दिली. चर्चेमधून वाहतुकीच्या विविध समस्यांवर उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या. हेल्मेट वापरासंबंधीच्या जनजागृतीमुळे शहरातील निम्म्याहून अधिक लोक हेल्मेटचा वापर करत असल्याचे सिंगल म्हणाले. महिला विशेषत: महाविद्यालयीन तरुणींकडून मात्र विविध कारणे सांगून हेल्मेटचा वापर टाळला जात असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. सिंगल यांनी ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून याबाबत महिला वाहतूक पोलिसांना विशेष सूचना देऊन नाकाबंदी दरम्यान तरुणींचे हेल्मेट वापरासंबंधी समुपदेशन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.