शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मनोरंजन वाहिन्यांची निवड करण्यात ग्राहकांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:06 IST

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु, या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना डीटीएच कंपन्यांनी तयार केलेले पॅकेज अथवा प्रक्षेपण करणाऱ्या कंपन्यांचे पॅकेज घ्यावे लागत नसल्याने ग्राहकांना अजूनही नको असलेल्या अनेक चॅनलचे पैसे भरावे लागत आहे.

ठळक मुद्देट्रायच्या नियमांना हरताळ : डीटीएच कंपन्या, केबलचालकांनी लादले पॅकेज

नाशिक : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) लागू केलेल्या नव्या नियमांमुळे १ फेब्रुवारीपासून देशभर दूरचित्रवाहिन्या पाहण्यासाठीचे समान शुल्क निश्चित करण्यात आले असून, ग्राहकांना त्यांच्या आवडीचे चॅनल निवडण्याचे स्वातंत्र्य दिलेआहे. परंतु, या नव्या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी केबल चालकांसोबतच डीटीएच कंपन्यांक डूनही सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना डीटीएच कंपन्यांनी तयार केलेले पॅकेज अथवा प्रक्षेपण करणाऱ्या कंपन्यांचे पॅकेज घ्यावे लागत नसल्याने ग्राहकांना अजूनही नको असलेल्या अनेक चॅनलचे पैसे भरावे लागत आहे. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही साडेतीनशे ते चारशे रुपये महिन्यांचे पॅकेज ग्राहकांवर लादले जात असल्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे ट्रायच्या नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटूनही चॅनल निवडताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या पाहण्यासाठी नवे नियम लागू होऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने जुन्याच पॅकजचे रिचार्ज करण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना अनावश्यक वाहिन्यांसाठीही शुल्क भरावे लागत असून, ट्रायच्या नवीन नियमांनंतरही केबल आॅपरेटर आणि ब्रॉडकास्टिंग कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खुल्या पद्धतीने आवडीचे एक-एक चॅनल निवडण्यासाठी अपेक्षित मदत मिळत नाही. केबल अथवा प्रक्षेपित वाहिन्यांवरून पॅकज निवडण्याची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. प्रक्रियेचे संपूर्ण ज्ञान नसल्याने ग्राहकांना ट्रायच्या नव्या नियमानुसार मनोरंजनाचा आनंद घेता येत नाही. ट्रायच्या नवीन नियमानुसार देशभरात वाहिन्यांचे एकसमान दरपत्रक ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये सशुल्क वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहण्यासाठी पाच पैशापासून ते १९ रुपयांपर्यंत किमती ठरवण्यात आल्या आहेत.तसेच चॅनल निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे पहिल्या १०० नि:शुल्क वाहिन्या आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या सशुल्क वाहिन्या अशी ग्राहकांना निवड करावी लागणार आहे. त्यामध्ये १५३ रुपये ४० पैशांचा बेसिक पॅक घेऊन त्यानंतर आपल्याला हव्या त्या सशुल्क वाहिन्या असे हे गणित असले तरी केबलचालक आणि डीटीएच कं पन्यांकडून ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने ग्राहकांना अजूनही अनावश्यक तथा बिगर आवडीच्या चॅनलचेही पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार