शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

ग्राहक झाले जागे

By admin | Updated: October 6, 2016 01:34 IST

ग्राहक झाले जागे

विजय मोरे नाशिकसमाजातील सर्वार्थाने नडलेला, पिडलेला आणि उपेक्षित घटक म्हणून ग्राहकांकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेकदा फसवणूक झाली, तरी तो शांत बसतो, असा पूर्वी समज होता़ मात्र, ग्राहक आता आपल्या अधिकारांप्रती चांगलेच जागरूक झाल्याचे नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये दाखल प्रकरणांच्या आकडेवारीवरून दिसून येते़ गत साडेचार वर्षांची आकडेवारी पाहता दोन हजार १७९ ग्राहकांनी तक्रारी केल्या़ विशेष म्हणजे त्यापैकी एक हजार ३३६ ग्राहकांच्या प्रकरणांवर सुनावणी होऊन ती निकालीही निघाली आहेत़ देशभरात विविध कंपन्यांच्या नावे जादा व्याजाचे, पैशांची आमिषे दाखवून गुंतवणुकीच्या योजनांचा प्रचार केला जातो़ यास भुलून वा आमिषाला बळी पडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट होते़ तर बँक, वैद्यकीय उपचार, टेलिफोन, विमा कंपन्या, बिल्डर, विद्युत पुरवठा करणारी सरकारी कंपनी, विमानसेवा, रेल्वे यांच्याकडून नागरिकांचे अर्थात ग्राहकांचे हक्क डावलून आर्थिक पिळवणूक केल्याचे प्रकार घडलेले आहेत़ अशा ग्राहकांच्या हक्कासाठी शासनाने २४ डिसेंबर १९८६ ला ग्राहक संरक्षण कायदा केला़नाशिकच्या ग्राहक न्यायालयामध्ये दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढ होत चालली असून प्रकरणे निकाली निघल्याचे प्रमाणही चांगले आहे़ विशेष म्हणजे बिल्डरकडून फ्लॅट किंवा घर खरेदी केल्यानंतर ठरलेल्या मुदतीत ताबा न देणे, ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र न देणे, ठरलेल्या रकमेच्या २० टक्के रक्कम मिळाल्यानंतरही लेखी करार करण्यास नकार देणाऱ्या शहरातील काही नामांकित बिल्डरांना ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी दोन वर्षे कारावास तसेच आर्थिक दंडाच्या शिक्षाही सुनावल्या आहेत़ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (ग्राहक न्यायालय) सुरू करण्यात आली आहेत़ या न्यायालयांमध्ये तक्रार करण्याची सोपी पद्धत, प्रकरणावर जलद व ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून दिला जाणारा न्याय यामुळे या तक्रारींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे़