शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सद्य:स्थितीत सामाजिक स्थित्यंतर अपरिहार्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:11 IST

नाशिक : शहराचे सुरू असलेले महानगरीकरण आणि त्यात कोरोना काळात अनेकांच्या जगण्याचेच प्रश्न अवघड झाले आहेत. अशा प्रकारच्या परिस्थितीचा ...

नाशिक : शहराचे सुरू असलेले महानगरीकरण आणि त्यात कोरोना काळात अनेकांच्या जगण्याचेच प्रश्न अवघड झाले आहेत. अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना समाजाने कधीही केला नव्हता. त्यामुळे सद्यस्थितीत सामाजिक स्थित्यंतर स्वरूपातील परिणाम अपरिहार्य असल्याची भावना सनदी लेखापाल तुषार पगार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नॅबचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी व्यक्त केली.

लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अंबडच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मुनशेट्टीवार यांनी नाशिकला सांस्कृतिक वारसा असला तरी एकूणातच नागरिकांच्या अभिरुचीत काळानुरूप बदल झाला असून या क्षेत्राला मिळणारा राजाश्रय आणि लोकसहभाग कमी होऊ लागल्याचे दिसते. तसेच सामाजिक कार्यासाठीची तळमळदेखील काहीशी कमी झाल्याचे मत व्यक्त केले. नाशिकच्या सर्वांगीण विकासामागे पूर्वीच्या काळी शहरातील नेत्यांनी दिलेले योगदानच कारणीभूत असल्याचेही मुनशेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी बोलताना पगार यांनी नाशिक शहराचा विकास हा नाशिकच्या गतीनेच होत असल्याचे नमूद केले. त्यामुळेच नाशिकचा विकास होतानादेखील नाशिक पुण्याच्या तुलनेत अद्यापही सुसह्य असल्याचे नमूद केले. कोरोना काळात सामान्य नागरिकांच्या जगण्याचे प्रश्न बिकट झाले असल्याने त्यांना अन्य कोणत्याही प्रश्नांचा विचारच करता येण्यासारखी स्थिती नाही. सध्याच्या स्थितीत प्रत्येक नागरिकाकडून स्वत:ला आणि कुटुंबाच्या जीवितरक्षणाला प्राधान्य दिले जात असून ते कटू असले तरी हेच वास्तव आहे. त्यातही कोरोना काळात सर्वाधिक झळ ही हातावर पोट असणाऱ्यांना तसेच निम्न मध्यमवर्गीयांना सोसावी लागली आहे. गोरगरिबांना निदान शासकीय योजना, अन्न, धान्याचा तरी काही लाभ मिळू शकला. मात्र, निम्न मध्यमवर्गातील किंवा ज्या घरातील कमावत्या व्यक्तीचेच निधन झाले अशा कुटुंबांची अवस्था सर्वाधिक बिकट झाल्याची भावना पगार यांनी बोलून दाखवली. कोरोना काळात सामाजिक दरी खूप वाढल्याचेही अनुभव समाजातील संवेदनशील व्यक्तींना जागोजागी दिसून आल्याचेही पगार यांनी नमूद केले.

इन्फो

कोरोनाचे परिणाम भविष्यातही दिसणार

कोरोनाच्या या दोन्ही लाटा हे समाजाला आलेले खूप मोठे आजारपण आहे. कोणत्याही मोठ्या आजारपणानंतर आपल्याला खूप अशक्तपणा येतो. त्याप्रमाणेच कोरोनामुळे समाजाच्या सर्व घटक आणि क्षेत्रांवर भविष्यात अधिक भयानक परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.

फोटो

११० किंवा १११