शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
8
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
9
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
10
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
11
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
12
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
13
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
14
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
15
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
16
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
18
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
19
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
20
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
Daily Top 2Weekly Top 5

जिज्ञासा जोपासणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन होय :  दिलीप देवबागकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 01:19 IST

कोणतीही घटना आणि कृती याकडे जिज्ञासीवृत्तीने पाहणे आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणे होय, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केले. उन्नती शाळेतील बालविज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सोनजे होते.

नाशिक : कोणतीही घटना आणि कृती याकडे जिज्ञासीवृत्तीने पाहणे आणि त्यासंबंधीचे प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच विज्ञानवादी दृष्टिकोन जोपासणे होय, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केले. उन्नती शाळेतील बालविज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोक सोनजे होते.  पंचवटीतील पेठरोड येथील उन्नती विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या बालविज्ञान केंद्र आणि बाल वाचनालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या इस्त्रो विभागाच्या प्रमुख दीप्ती देवबागकर, इंडिया चाप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरूडे, तपारिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवरामकृष्णन, संस्थेचे पदाधिकारी बापू बागड, सुभाष मुसळे, रमाकांत अलई, रवि अमृतकर, आबा पाटकर, सुभाष कुंभारे, विस्तार अधिकारी नेहा शिरूडे, वास्तुविशारद स्मिता वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे यांनी बालविज्ञान केंद्राचे उद्देश सांगताना सामान्य घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे अशी भावना असल्याचे सांगून या केंद्रामुळे अशा मुलांमध्ये स्फूर्ती निर्माण होईल, असे सांगितले. यावेळी शास्त्रज्ञ शिरूडे, दीप्ती देवबागकर, शिवरामकृष्णन, अ‍ॅड. मनिष अमृतकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविक प्राथमिकचे मुख्याध्यापक नंदलाल धांडे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष मुसळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन जितेंद्र सोनजे व प्रमोद कोठावदे यांनी केले. कार्यक्रमास सुधाकर बागड, चंदन मेखे, दिलीप पाटकर, विलास कोठावणे, सुभाष कुंभारे, रामदास अमृतकर, बापूराव शिनकर, रमाकांत अलई, सतीश सोनजे, संजय घरटे, आदी उपस्थित होते.शिकण्याची जिद्द महत्त्वाचीयावेळी देवबागकर म्हणाले, कोणतेही शिक्षण आणि माध्यम हे बुद्धिमत्तेच्या आड येत नाही. मराठी माध्यमातील विद्यार्थीदेखील हे मोठ्या पदापर्यंत पोहचू शकतात. परंतु त्यांच्यात शिकण्याची जिद्द असणे महत्त्वाचे आहे. कोणतीही गोष्ट असाध्य नाही, फक्त ते साध्य करण्याची जिद्द बाळगली तर काहीही शिकता येऊ शकते, असेही देवबागकर म्हणाले.

टॅग्स :scienceविज्ञान