शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका वर्तविला जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून निर्बंध कडक करण्यात ...

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका वर्तविला जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून निर्बंध कडक करण्यात आले असून जमावबंदी, संचारबंदीमध्ये बदल करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. यानुसार दीपक पाण्डेय यांनी शहरात जमावबंदी, संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीचे आदेश देत यापूर्वी ८ जून रोजी काढलेले आदेश रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. नव्या आदेशानुसार २८ जून ते २७ जुलै या कालावधीसाठी शहरात पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असून नागरिकांनी अनावश्यकरीत्या गर्दी करू नये, तसेच संध्याकाळी विनाकारण घराबाहेर पडण्याचे टाळावे, अन्यथा पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळनंतर अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी अथवा अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी घराबाहेर पडताना आवश्यक पुरावा, मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

--इन्फो--

भरारी पथकांची नियुक्ती

विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलीस ठाणेनिहाय या आदेशांची अंमलबजावणी केली जात आहे किंवा नाही, याची खात्री पटविण्यासाठी आयुक्तालय स्तरावर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांमार्फत तपासणी करून नियम मोडणाऱ्या व्यावसायिक किंवा नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

---इन्फो--

...असे आहेत नवे नियम

शहरातील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता) सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुल्या राहतील.

दुपारी चार वाजेनंतर अन्य आस्थापना सुरू असल्याचे आढळून आल्यास पाच हजारांचा दंड आस्थापना चालकांना करण्यात येईल.

जमावबंदी, संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी कोठेही थुंकताना आढळून आल्यास १ हजारांचा दंड केला जाणार आहे.

बाजारपेठांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यास १ हजारांचा होईल दंड

बाजारात खरेदीसाठी जाताना दिलेल्या पासवरील नमूद वेळेत ग्राहकाने खरेदी आटोपून बाजारपेठ सोडणे अनिवार्य आहे.

पासची निर्धारित वेळ संपल्यानंतर बाजारात रेंगाळताना आढळून येणाऱ्या ग्राहकांना एक हजारांचा दंड करण्यात येणार आहे.