शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

नारळाच्या झाडांची लागवड

By admin | Updated: July 3, 2015 00:24 IST

बहरला गोदाकाठ

नाशिक : गोदावरी नदी हे शहराचे वैभव. या नदीच्या काठावर दर बारा वर्षांनी कुंभ पर्वणी पार पडते. नाशिकचा कुंभमेळा अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला आहे. यानिमित्त गोदावरीची स्वच्छता व नदीकाठाचे सौंदर्य वाढीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शासकीय, सामाजिक स्तरावर प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रामवाडी पूल ते अहल्यादेवी होळकर पुलापर्यंत नारळाच्या ४० वृक्षांची लागवड जयंम फाउंडेशनच्या वतीने आज (दि.२) करण्यात आल्याने गोदाकाठाचे रूपडे पालटले आहे. जणू कोकणातल्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आनंद संध्याकाळी गोदापार्कवर नाशिककर लुटत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन गोदापार्क विकसित केला जात असून, त्याला आगळेवेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी पालिकेच्या माध्यमातून रामवाडी पूल ते अहल्यादेवी पुलापर्यंतचा गोदापार्क परिसर संपूर्ण स्वच्छ करून त्या ठिकाणी वृक्षारोपणाची संकल्पना जयंम फ ाउडेशनच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडली होती. फाउंडेशनचे मनोज टिब्रिवाला, अ‍ॅड. शमा सांगवी, डॉ. सारंग इंगळे, डॉ. आश्विनकुमार भारद्वाज आदिंनी या गोदापार्क परिसराला भेट देऊन पाहणी केली होती. त्यादरम्यान, गोदाकाठालगत नदीपात्रापासून सुमारे पाच फूट अंतरावर वर्तुळाकार पद्धतीने नारळाची वृक्षलागवड केल्यास या भागातील गोदावरीचा किनारा अतिशय सुंदर होईल, असा विचार पदाधिकाऱ्यांच्या मनात आला. या विचाराला कृतीचे स्वरूप आज देण्यात आले. नारळाचे ४० वृक्ष गोदाकिनारी लावण्यात आले असून, लवकरच अजून ११ वृक्षांची येथे लागवड करण्यात येणार आहेत. एकूण नारळाची ५१ वृक्ष लावण्याचा संस्थेचा मानस आहे. गोदाकाठ जणू समुद्रकिनाऱ्याप्रमाणे भासत असून, नाशिककरांनी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी गर्दी केली होती.