शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

सकाळच्यावेळी दुकानांमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:11 IST

रस्ते व्यवस्थित बुजविले नसल्याने अपघात नाशिक : विविध कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. काम ...

रस्ते व्यवस्थित बुजविले नसल्याने अपघात

नाशिक : विविध कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. काम झाल्यानंतर हे खड्डे व्यवस्थित बुजविले जात नसल्याने रस्ता वर खाली होऊन दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी

नाशिक : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

वाहतूक कोंडीमुळे चालणे मुश्कील

नाशिक : अनेक रस्त्यांवर झालेल्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून या ठिकाणाहून चालणेही मुश्कील बनले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे जिकिरीचे होते. काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी बॅरिकेट्‌स‌्ही लावलेले नाहीत.

आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा

नाशिक : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे खासगी आणि शासकीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आला होता. अनेकांना रजा मिळणेही मुश्कील बनले होते.

बंदमुळे अनेक उद्यानांत अस्वच्छता

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून उद्याने बंद असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. काही ठिकाणी खेळण्यांची मोडतोड झाली आहे. उद्यानांची स्वच्छता करून खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

नाशिक : पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर शेतीच्या मशागतीचे दरही वाढले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खरीप हंगामासाठी तयारी करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

नाशिक : द्वारका चौकात अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या ठिकाणी असलेल्या सिग्नलकडेही अनेकांचे दुर्लक्ष होते. या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.