शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘सातबारा’साठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:42 IST

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देपीकविमा : नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये एका तलाठ्याकडे नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो आहे. बागलाण तालुक्यातील जोरण व किकवारी खुर्द तलाठी कार्यालयाला एकच तलाठी आहे. तसेच जोरण तलाठी कार्यालय अंतर्गत जोरण, कपालेश्वर, देवपूर, विंचुरे, निकवेल तसेच किकवारी खुर्द येथील तलाठी कार्यालय अंतर्गत किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, तळवाडे दिगर, भिलदर आदी गावांचा समावेश होतो. सध्या मात्र फळबाग डाळिंबाची मुदत संपली आहे. डाळिंबाचा पीकविमा भरण्यासाठी काही शेतकरी तालुक्यात वंचित राहिले. ऐन वेळेस कागदपत्रे जमवाजमवी करावी लागली. तात्या भेटले तर सातबारा काढण्यासाठी सर्व्हर डाउन अशा अनेक समस्या शेतकºयांपुढे आल्या तसेच खरीप मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांचा पीकविमा सध्या चालू आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी व तसेच ग्रामीण भागातील सायबर कॅफे यांच्यावर तालुक्यातील शेतकºयांनी गर्दी केली आहे.शासनाने गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती केली नसल्यामुळे तालुक्यात एका तलाठ्यास नऊ-दहा गावांचा कारभार पाहावा लागत आहे तसेच शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. योजनांसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याच्यावेळी कर्मचाºयांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. एका कर्मचाºयास नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो व त्या कर्मचाºयावर अतिरिक्त भार येत असल्यामुळे कोणते काम करावे हेच त्या कर्मचाºयास सुचत नाही, असे तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.बागलाण तालुक्यातील काही गावांतील तलाठ्यास दोन सजांचे काम पहावे लागत आहे तसेच ऐन वेळेस आम्हाला सातबारा व काही कामांना नेहमी अडचणी येतात. शासनाने तलाठी भरती केली नसल्यामुळे एका तलाठ्यास नऊ ते दहा गावांचा कारभार पाहावा लागतो, यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी नवीन तलाठी भरतीची मागणी करावी व तलाठी यांच्यावर अतिरिक्त भार येत असून तो कमी होईल. - बाबाजी सावकार, शेतकरी