शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
2
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

‘सातबारा’साठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:42 IST

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देपीकविमा : नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये एका तलाठ्याकडे नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो आहे. बागलाण तालुक्यातील जोरण व किकवारी खुर्द तलाठी कार्यालयाला एकच तलाठी आहे. तसेच जोरण तलाठी कार्यालय अंतर्गत जोरण, कपालेश्वर, देवपूर, विंचुरे, निकवेल तसेच किकवारी खुर्द येथील तलाठी कार्यालय अंतर्गत किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, तळवाडे दिगर, भिलदर आदी गावांचा समावेश होतो. सध्या मात्र फळबाग डाळिंबाची मुदत संपली आहे. डाळिंबाचा पीकविमा भरण्यासाठी काही शेतकरी तालुक्यात वंचित राहिले. ऐन वेळेस कागदपत्रे जमवाजमवी करावी लागली. तात्या भेटले तर सातबारा काढण्यासाठी सर्व्हर डाउन अशा अनेक समस्या शेतकºयांपुढे आल्या तसेच खरीप मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांचा पीकविमा सध्या चालू आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी व तसेच ग्रामीण भागातील सायबर कॅफे यांच्यावर तालुक्यातील शेतकºयांनी गर्दी केली आहे.शासनाने गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती केली नसल्यामुळे तालुक्यात एका तलाठ्यास नऊ-दहा गावांचा कारभार पाहावा लागत आहे तसेच शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. योजनांसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याच्यावेळी कर्मचाºयांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. एका कर्मचाºयास नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो व त्या कर्मचाºयावर अतिरिक्त भार येत असल्यामुळे कोणते काम करावे हेच त्या कर्मचाºयास सुचत नाही, असे तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.बागलाण तालुक्यातील काही गावांतील तलाठ्यास दोन सजांचे काम पहावे लागत आहे तसेच ऐन वेळेस आम्हाला सातबारा व काही कामांना नेहमी अडचणी येतात. शासनाने तलाठी भरती केली नसल्यामुळे एका तलाठ्यास नऊ ते दहा गावांचा कारभार पाहावा लागतो, यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी नवीन तलाठी भरतीची मागणी करावी व तलाठी यांच्यावर अतिरिक्त भार येत असून तो कमी होईल. - बाबाजी सावकार, शेतकरी