शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

‘सातबारा’साठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:42 IST

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देपीकविमा : नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ गावांचा कारभार पाहण्यासाठी एकच तलाठी असल्यामुळे कार्यालयात गर्दी झाली आहे.बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये एका तलाठ्याकडे नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो आहे. बागलाण तालुक्यातील जोरण व किकवारी खुर्द तलाठी कार्यालयाला एकच तलाठी आहे. तसेच जोरण तलाठी कार्यालय अंतर्गत जोरण, कपालेश्वर, देवपूर, विंचुरे, निकवेल तसेच किकवारी खुर्द येथील तलाठी कार्यालय अंतर्गत किकवारी खुर्द, किकवारी बुद्रुक, तळवाडे दिगर, भिलदर आदी गावांचा समावेश होतो. सध्या मात्र फळबाग डाळिंबाची मुदत संपली आहे. डाळिंबाचा पीकविमा भरण्यासाठी काही शेतकरी तालुक्यात वंचित राहिले. ऐन वेळेस कागदपत्रे जमवाजमवी करावी लागली. तात्या भेटले तर सातबारा काढण्यासाठी सर्व्हर डाउन अशा अनेक समस्या शेतकºयांपुढे आल्या तसेच खरीप मका, बाजरी, सोयाबीन आदी पिकांचा पीकविमा सध्या चालू आहे. यासाठी तालुक्याच्या ठिकाणी व तसेच ग्रामीण भागातील सायबर कॅफे यांच्यावर तालुक्यातील शेतकºयांनी गर्दी केली आहे.शासनाने गेल्या काही वर्षांपासून तलाठी भरती केली नसल्यामुळे तालुक्यात एका तलाठ्यास नऊ-दहा गावांचा कारभार पाहावा लागत आहे तसेच शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात. योजनांसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याच्यावेळी कर्मचाºयांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. एका कर्मचाºयास नऊ गावांचा कारभार पाहावा लागतो व त्या कर्मचाºयावर अतिरिक्त भार येत असल्यामुळे कोणते काम करावे हेच त्या कर्मचाºयास सुचत नाही, असे तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.बागलाण तालुक्यातील काही गावांतील तलाठ्यास दोन सजांचे काम पहावे लागत आहे तसेच ऐन वेळेस आम्हाला सातबारा व काही कामांना नेहमी अडचणी येतात. शासनाने तलाठी भरती केली नसल्यामुळे एका तलाठ्यास नऊ ते दहा गावांचा कारभार पाहावा लागतो, यासाठी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांनी नवीन तलाठी भरतीची मागणी करावी व तलाठी यांच्यावर अतिरिक्त भार येत असून तो कमी होईल. - बाबाजी सावकार, शेतकरी