शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:58 IST

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके कोमेजू लागली आहेत.

ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात पावसाअभावी पिके करपू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके कोमेजू लागली आहेत. परिसरात मका पिकावर लष्करी अळीने थैमान घातले आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. परिसरात जोरदार पाऊस झाला नसल्यामुळे ओतूर धरण कोरडे ्रआहे. त्यामुळे मार्कण्डेय नदीस पाणी नसल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. पाण्याअभावी लाल कांद्याची रोपे टाकता आली नाही. तसेच गतवर्षाच्या उन्हाळ कांद्यास दर नसल्यामुळे चाळीतच कांदा सडत आहे. कोरोना महामारीमुळे बळीराजाही संकटात सापडला आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे ते खरीप पिकांना भरत आहेत. मात्र ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांचे मात्र हाल होत आहेत. बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. पुढील आठ दिवसात पाऊस आला नाही तर हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

-----------------------------

मानोरीत पिके धोक्यातमानोरी : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने ऐन हंगामातील मका, सोयाबीन पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतित झाला आहे. यंदाही मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मक्यावर सातत्याने महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मोठ्या मेहनतीने केलेली मका, सोयाबीन, बाजरी पिकांची लागवड पावसाअभावी धोक्यात आली आहे. उष्मा वाढत असल्याने मका पीक सुकण्यास सुरु वात झाली आहे. पुढच्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास मका, सोयाबीन पीक धोक्यात येणार असून, हजारो रु पयांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकरी हृतिक दुघड यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Nashikनाशिक