शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पाटोदा परिसरात पिके तरारली

By admin | Updated: September 17, 2016 00:06 IST

येवला तालुका : सर्वदूर पाऊस, उत्तरा नक्षत्राने बळीराजा सुखावला

पाटोदा : दिड महिन्यापासून दडी दिलेला पाऊस अनंत चतुर्दशीला सक्र ीय झाल्याने येवला तालुक्यात खरीप हंगामातील पिके तरारून आली आहे. उत्तरा नक्षत्राच्या प्रारंभीच पावसाने जोरदार प्रारंभ केल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे.आॅगस्ट महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने बाजरी, मका, सोयाबीन पिके सुकू लागली होती. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो कि काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता. विहिरीच्या पाण्यावर तसेच पालखेड डावा कालवा लाभ क्षेत्रातील शेतकरी कालव्याच्या पाण्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र वीज वितरण कंपनीने पूर्व सूचना न देता आठ दिवस दिवसा व आठ दिवस रात्रीचे भारिनयमन सुरु केल्याने पाणी असूनही ते पिकांना देता येत नव्हते. त्यामळे शेतकऱ्यांनी पूर्वीप्रमाणे भारिनयमन करावे अशी मागणी केली होती. परंतु अधिकारी वर्गाने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण झाली होती. त्यातच तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी का होईना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. गेल्या चार पाच वर्षापासून तालुक्यात दुष्काळ पडत आहे. यावर्षी खरीपाची पिके बहरली होती. परंतु दिड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके पाण्याआभावी कोमेजली होती. यावर्षीही खरीपाची पिके पाण्याआभावी वाया जातात कि काय अशी चिंता शेतकरी वर्गाला सतावत असतांना पावसाचे आगमन सुखावत आहे. (वार्ताहर)