शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी खरिप हंगामातील पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:11 IST

▪️नागली वरईची रोपे करपली : भाताची लावणी खोळंबली नागली, वरईची रोपे करपली : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात भाताची लावणी खोळंबली ...

▪️नागली वरईची रोपे करपली : भाताची लावणी खोळंबली

नागली, वरईची रोपे करपली : त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात भाताची लावणी खोळंबली

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात वरूणराजाने अवकृपा केल्याने भात नागली व वरईची पिके उन्हामुळे करपू लागल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ्यात पिकांना कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती उद्भवल्याने भात, नागली व वरईची रोपे पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यात झालेल्या तौक्ते वादळाच्या पावसाने वातावरणात आवश्यक असा ओलावा निर्माण केला होता. त्यानंतर रोहिणींच्या सरीने बळीराजाला दिलासा मिळून त्या जोरावर शेतकऱ्यांनी भात, नागली वरईची पेरणी केली; मात्र पुढील पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक न कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला. मृग व आर्द्रा नक्षत्राच्या सुरुवातीला काहीशा प्रमाणात पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग सुरू केली.

मात्र त्यानंतर कडक ऊन पडून रोपे पिवळी पडू लागली. देवगावसह वावीहर्ष, श्रीघाट, टाकेदेवगाव, चंद्राचीमेट, आव्हाटे, डहाळेवाडी आदी. परिसरातील गावांमध्ये पिके तयार झाली आहेत; परंतु पावसाअभावी आवणामध्ये पाणी व आवश्यक चिखल, गाळ नसल्याने लावणीची कामे खोळंबली आहेत. पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने देवगाव परिसरातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदाही भात, नागली व वरईच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

----------------------------

जोरदार पावसाची प्रतीक्षा

दरवर्षी जुलै महिन्यात भात व नागलीची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. आषाढी एकादशीपर्यंत हमखास संततधार पाऊस सुरू होतो. या आशेवर शेतकऱ्यांनी डोंगर उतारावर नागली रोपांची लावणी करतात; मात्र पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागलीची रोपे करपली आहेत. आदिवासी भागात भात व नागली या दोन्ही पिकांचे रोपे तयार करून नंतर लावणी केली जात असल्याने एकदा रोपे खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभराच्या पिकावर पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे. आदिवासी भागातील भात, नागली, वरई शेती पावसावर तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पावसाळी शेतीवर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभराच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

----------------------

पाऊस पडत नसल्यामुळे भात, नागली पिकांची लावणी रखडली आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस पडण्याची कुठलीच चिन्हे दिसत नाहीत. उलटपक्षी कडक उन्हामुळे तयार झालेली रोपे उन्हाच्या तडाख्याने पिवळी पडून करपत आहे.

- लक्ष्मण देहाडे, बर्ड्याचीवाडी, शेतकरी.

--------------------

देवगाव परिसरात श्रीघाट येथे पावसाअभावी आवनांमध्ये खोळंबलेली लावणी. (०७ देवगाव)

070721\07nsk_9_07072021_13.jpg

०७ देवगाव