शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

धुके, पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 18:16 IST

जळगाव नेऊर : खरीप पिकांच्या संकटातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच येवला तालुक्यात सध्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून, शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : करपा, डाऊनी, बुरशी रोगाच्या विळख्याने उत्पादन घटणार?

जळगाव नेऊर : खरीप पिकांच्या संकटातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच येवला तालुक्यात सध्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत असून, शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.या वातावरणामुळे पिके जगविण्यासाठी औषध फवारणी करून शेतकऱ्यांचा खर्च भरमसाट वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा रोपे नसल्याने भाजीपाला केला होता; पण त्यातूनही खर्चदेखील वसूल न झाल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरवला आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके हे शेतातच सोडून दिलेले आहे.आता मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून रिमझिम पाऊस, दव आणि धुके पडत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी करूनही भाव मिळत नसल्याने वैतागून भाजीपाला पिके सोडून दिलेले आहे. तसेच पुढील दिवसांमध्ये थोड्या फार प्रमाणात असलेल्या पोळ कांदा काढणीस सुरुवात होणार आहे; परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाण्याची झाली आहे. सतत बदलणारे हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी जास्त प्रमाणात वाढली आहे.गेली चार-पाच दिवसांपासून सतत पडणारे धुके, दव व पाऊस यामुळे कांदा पीक करपा रोगाच्या विळख्यात सापडले असून, औषधे फवारणी करूनही रोगट वातावरण साथ सोडायला तयार नसल्याने मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे कांदा पिकावर करपा येऊन कांदा पात करपत आहे.- नीलेश शिंदे, जळगाव नेऊर.(फोटो १४ जळगाव नेऊर)जळगाव नेऊर परिसरात सतत पडणाऱ्या धुके, ढगाळ वातावरणामुळे औषधे फवारणी करताना शेतकरी.