शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्यांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

नांदगाव : विम्याचे असमान वाटप करून, हजारो शेतकरी फसविले गेले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी, ‘देना आया तो रोना आया’ अशी ...

नांदगाव : विम्याचे असमान वाटप करून, हजारो शेतकरी फसविले गेले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी, ‘देना आया तो रोना आया’ अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली असून, विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे २६ हजार शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडले असता, विमा कंपनीने भरपाई न देऊन कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा शेतकऱ्यांना चुना तर लावलाच, परंतु करदात्यांच्या करातून केंद्र व राज्य सरकारने भरलेल्या प्रीमियमच्या कोट्यवधी रुपयांबद्दल संशय निर्माण केला जात आहे. खासगी विमा कंपन्या व त्यांची नेमणूक करणारी कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात आली असून, या लोकापवादाला आमदार सुहास कांदे यांच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे बळ मिळाले आहे.

सन २०२०च्या खरीप हंगामात झालेले नुकसान विम्याच्या रकमेतून अंशत: भरून निघण्याची शेतकरी वर्गाची आशा मावळत असताना, कांदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामुळे पीडित शेतकऱ्यांच्या आशांना अपेक्षेचे धुमारे फुटले आहेत. विमा कंपनीचा शेतकरी वर्गावर पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने १३ जानेवारी, २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली. खरीप पिकाच्या प्रीमियमची १.५ टक्के व रब्बी पिकाच्या प्रीमियमची २ टक्के रक्कम शेतकरी भरतील व उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारने भरावयाची, असा फतवा निघून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. करदात्यांचे हजारो कोटी रुपये सरकारने भरले, परंतु त्याचे योग्य मूल्य विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या पदरात पडते आहे किंवा नाही, याकडे अंधदृष्टीने बघितले गेले. विमा परताव्याचे मूल्यमापन करणारी व्यवस्था पांगळी झाल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत निर्माण होऊन हजारो शेतकरी वंचित राहिले.

एका विमा कंपनीला १५७५.४२ कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला आणि ४३८ कोटी रुपयांचा परतावा केला, म्हणजे कंपनीला ७२.१४ टक्के नफा झाला. इतर खासगी कंपन्यांना टक्केवारीने पुढीलप्रमाणे नफा झाला.

इन्फो

नांदगावच्या प्रकरणात दंड कुठे?

विमा कंपनीने विहित मुदतीत विम्याच्या रकमेचा परतावा दिला नाही, तर १२ टक्के व्याज दराने दंड केला जातो. २०१७-१८ मध्ये चार इन्शुरन्स कंपन्यांना केंद्र सरकारने २२.१७ कोटींचा दंड ठोठावला आहे. नांदगावच्या प्रकरणात दंडाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे खासगी विमा कंपन्यांची तिजोरी कोट्यवधी रुपयांनी भरली जात आहे, ही बाब उघड आहे. विम्याच्या परताव्याचा हक्क डावलून हे घडत असते का, हा प्रश्न विचारला जात आहे.