शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पीकविमा कंपन्यांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

नांदगाव : विम्याचे असमान वाटप करून, हजारो शेतकरी फसविले गेले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी, ‘देना आया तो रोना आया’ अशी ...

नांदगाव : विम्याचे असमान वाटप करून, हजारो शेतकरी फसविले गेले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी, ‘देना आया तो रोना आया’ अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली असून, विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे २६ हजार शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडले असता, विमा कंपनीने भरपाई न देऊन कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा शेतकऱ्यांना चुना तर लावलाच, परंतु करदात्यांच्या करातून केंद्र व राज्य सरकारने भरलेल्या प्रीमियमच्या कोट्यवधी रुपयांबद्दल संशय निर्माण केला जात आहे. खासगी विमा कंपन्या व त्यांची नेमणूक करणारी कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात आली असून, या लोकापवादाला आमदार सुहास कांदे यांच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे बळ मिळाले आहे.

सन २०२०च्या खरीप हंगामात झालेले नुकसान विम्याच्या रकमेतून अंशत: भरून निघण्याची शेतकरी वर्गाची आशा मावळत असताना, कांदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामुळे पीडित शेतकऱ्यांच्या आशांना अपेक्षेचे धुमारे फुटले आहेत. विमा कंपनीचा शेतकरी वर्गावर पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने १३ जानेवारी, २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली. खरीप पिकाच्या प्रीमियमची १.५ टक्के व रब्बी पिकाच्या प्रीमियमची २ टक्के रक्कम शेतकरी भरतील व उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारने भरावयाची, असा फतवा निघून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. करदात्यांचे हजारो कोटी रुपये सरकारने भरले, परंतु त्याचे योग्य मूल्य विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या पदरात पडते आहे किंवा नाही, याकडे अंधदृष्टीने बघितले गेले. विमा परताव्याचे मूल्यमापन करणारी व्यवस्था पांगळी झाल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत निर्माण होऊन हजारो शेतकरी वंचित राहिले.

एका विमा कंपनीला १५७५.४२ कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला आणि ४३८ कोटी रुपयांचा परतावा केला, म्हणजे कंपनीला ७२.१४ टक्के नफा झाला. इतर खासगी कंपन्यांना टक्केवारीने पुढीलप्रमाणे नफा झाला.

इन्फो

नांदगावच्या प्रकरणात दंड कुठे?

विमा कंपनीने विहित मुदतीत विम्याच्या रकमेचा परतावा दिला नाही, तर १२ टक्के व्याज दराने दंड केला जातो. २०१७-१८ मध्ये चार इन्शुरन्स कंपन्यांना केंद्र सरकारने २२.१७ कोटींचा दंड ठोठावला आहे. नांदगावच्या प्रकरणात दंडाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे खासगी विमा कंपन्यांची तिजोरी कोट्यवधी रुपयांनी भरली जात आहे, ही बाब उघड आहे. विम्याच्या परताव्याचा हक्क डावलून हे घडत असते का, हा प्रश्न विचारला जात आहे.