शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पीकविमा कंपन्यांचे उखळ पांढरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

नांदगाव : विम्याचे असमान वाटप करून, हजारो शेतकरी फसविले गेले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी, ‘देना आया तो रोना आया’ अशी ...

नांदगाव : विम्याचे असमान वाटप करून, हजारो शेतकरी फसविले गेले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी, ‘देना आया तो रोना आया’ अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली असून, विमा कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात सुमारे २६ हजार शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडले असता, विमा कंपनीने भरपाई न देऊन कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा शेतकऱ्यांना चुना तर लावलाच, परंतु करदात्यांच्या करातून केंद्र व राज्य सरकारने भरलेल्या प्रीमियमच्या कोट्यवधी रुपयांबद्दल संशय निर्माण केला जात आहे. खासगी विमा कंपन्या व त्यांची नेमणूक करणारी कार्यप्रणाली संशयाच्या भोवऱ्यात आली असून, या लोकापवादाला आमदार सुहास कांदे यांच्या उच्च न्यायालयातील याचिकेमुळे बळ मिळाले आहे.

सन २०२०च्या खरीप हंगामात झालेले नुकसान विम्याच्या रकमेतून अंशत: भरून निघण्याची शेतकरी वर्गाची आशा मावळत असताना, कांदे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामुळे पीडित शेतकऱ्यांच्या आशांना अपेक्षेचे धुमारे फुटले आहेत. विमा कंपनीचा शेतकरी वर्गावर पडणारा आर्थिक भार कमी व्हावा, या उद्देशाने १३ जानेवारी, २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू करण्यात आली. खरीप पिकाच्या प्रीमियमची १.५ टक्के व रब्बी पिकाच्या प्रीमियमची २ टक्के रक्कम शेतकरी भरतील व उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारने भरावयाची, असा फतवा निघून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. करदात्यांचे हजारो कोटी रुपये सरकारने भरले, परंतु त्याचे योग्य मूल्य विमा कंपनीकडून शेतकऱ्याच्या पदरात पडते आहे किंवा नाही, याकडे अंधदृष्टीने बघितले गेले. विमा परताव्याचे मूल्यमापन करणारी व्यवस्था पांगळी झाल्याचे चित्र गेल्या तीन वर्षांत निर्माण होऊन हजारो शेतकरी वंचित राहिले.

एका विमा कंपनीला १५७५.४२ कोटी रुपयांचा प्रीमियम मिळाला आणि ४३८ कोटी रुपयांचा परतावा केला, म्हणजे कंपनीला ७२.१४ टक्के नफा झाला. इतर खासगी कंपन्यांना टक्केवारीने पुढीलप्रमाणे नफा झाला.

इन्फो

नांदगावच्या प्रकरणात दंड कुठे?

विमा कंपनीने विहित मुदतीत विम्याच्या रकमेचा परतावा दिला नाही, तर १२ टक्के व्याज दराने दंड केला जातो. २०१७-१८ मध्ये चार इन्शुरन्स कंपन्यांना केंद्र सरकारने २२.१७ कोटींचा दंड ठोठावला आहे. नांदगावच्या प्रकरणात दंडाचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे खासगी विमा कंपन्यांची तिजोरी कोट्यवधी रुपयांनी भरली जात आहे, ही बाब उघड आहे. विम्याच्या परताव्याचा हक्क डावलून हे घडत असते का, हा प्रश्न विचारला जात आहे.