शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

अवकाळीमुळे सहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे ...

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ६०८९.०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वाधिक नुकसान हे सटाणा तालुक्यात झाले आहे. तालुक्यात २७३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे २८२ गावे प्रभावित झाली आहेत. या गावांमधील एकूण १०,१७० शेतकऱ्यांच्या ६०८९.०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ४०९३.९० हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५३ हेक्टरवरील वार्षिक फळ पिकांना फटका बसला. १९४२.१५ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकेदेखील बाधित झाली आहेत. नांदगाव, देवळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी वगळत उर्वरित तालुक्यांमधील , कांदा, हरभरा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

--इन्फो--

अवकाळीचा सर्वाधिक फटका सटाणा तालुक्याला बसला असून, येथील ३९११ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या १८९५ इतकी आहे तर मालेगावमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १५६० इतकी आहे. चांदवडमधील ७११ इतके शेतकरी प्रभावित झाले आहेत. सटाणा तालुक्यात नुकसान अधिक असले तरी जिल्ह्यात निफाडमधील सर्वाधिक ९० गावे बाधित झाले आहेत. त्याखालोखाल दिंडोरी, सिन्नर तालुक्यातील गावांची संख्या आहे.

--इन्फो--

बाधित गावे:२८२

शेतकरी: १०,१७०

बागायत क्षेत्र:४०९३.९० हेक्टर

वार्षिक फळपिके: ५३ हेक्टर

बहुवार्षिक फळपिके: १९४२.१५ हेक्टर