शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:11 IST

परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आघार : परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आघार बुद्रुक, ढवळेश्वर, पांढरूण, बेनगाव परिसरात जूनपासून अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे मका पिकाची दुबार पेरणी करावी लागली होती. वेळेवर पाऊस न आल्याने मका पिकाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली आहे. कणीस मोठे प्रमाणात न येता छोटे-छोटे मका कणीस शेतात आहेत. तसेच बाजरी पीकही शेतकºयांनी कमी प्रमाणात पेरणी केलेली होती. सध्या शेतकºयांनी मजुरांकडून मका, बाजरी, पिकांची काढणी केलेली आहे. बाजरी, मका कणीस शेतात असताना परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून थैमान घातले आहे. त्यामुळे मका, बाजरी कणीस पावसात भिजून कणसाला कोंब फुटत आहेत. आधीच उत्पादनात घट झालेली असताना परतीच्या पावसाच्या पुन्हा आगमनामुळे शेतकºयांचे मका, बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे. कांदा पिकाची गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतकºयांनी लागण केली आहे. कांदा पिकाचेदेखील पावसामुळे नुकसान होत आहे. कांदा पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने शेतकºयांना पीक नुकसानभरपाई अनुदान द्यावे. सदर पिकांचा पंचनामा व्हावा तसेच पीक विमादेखील शेतकºयांनी काढलेला आहे. त्यांनाही पीक नुकसान विमा मंजूर करावा तसेच दिवाळीपूर्वी शासनाने सरसकट कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकरी रमेश हिरे, भाऊसाहेब हिरे, संतोष सावंत, प्रभाकर सावंत, दिलीप निकम, विठ्ठल खैरनार आदींनी केली आहे.