शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:11 IST

परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आघार : परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आघार बुद्रुक, ढवळेश्वर, पांढरूण, बेनगाव परिसरात जूनपासून अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे मका पिकाची दुबार पेरणी करावी लागली होती. वेळेवर पाऊस न आल्याने मका पिकाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली आहे. कणीस मोठे प्रमाणात न येता छोटे-छोटे मका कणीस शेतात आहेत. तसेच बाजरी पीकही शेतकºयांनी कमी प्रमाणात पेरणी केलेली होती. सध्या शेतकºयांनी मजुरांकडून मका, बाजरी, पिकांची काढणी केलेली आहे. बाजरी, मका कणीस शेतात असताना परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून थैमान घातले आहे. त्यामुळे मका, बाजरी कणीस पावसात भिजून कणसाला कोंब फुटत आहेत. आधीच उत्पादनात घट झालेली असताना परतीच्या पावसाच्या पुन्हा आगमनामुळे शेतकºयांचे मका, बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे. कांदा पिकाची गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतकºयांनी लागण केली आहे. कांदा पिकाचेदेखील पावसामुळे नुकसान होत आहे. कांदा पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने शेतकºयांना पीक नुकसानभरपाई अनुदान द्यावे. सदर पिकांचा पंचनामा व्हावा तसेच पीक विमादेखील शेतकºयांनी काढलेला आहे. त्यांनाही पीक नुकसान विमा मंजूर करावा तसेच दिवाळीपूर्वी शासनाने सरसकट कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकरी रमेश हिरे, भाऊसाहेब हिरे, संतोष सावंत, प्रभाकर सावंत, दिलीप निकम, विठ्ठल खैरनार आदींनी केली आहे.