शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:11 IST

परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

आघार : परिसरात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले असून, शेतात काढून ठेवलेला मका पावसात भिजल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आघार बुद्रुक, ढवळेश्वर, पांढरूण, बेनगाव परिसरात जूनपासून अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे मका पिकाची दुबार पेरणी करावी लागली होती. वेळेवर पाऊस न आल्याने मका पिकाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट झाली आहे. कणीस मोठे प्रमाणात न येता छोटे-छोटे मका कणीस शेतात आहेत. तसेच बाजरी पीकही शेतकºयांनी कमी प्रमाणात पेरणी केलेली होती. सध्या शेतकºयांनी मजुरांकडून मका, बाजरी, पिकांची काढणी केलेली आहे. बाजरी, मका कणीस शेतात असताना परतीच्या पावसाने तीन दिवसांपासून थैमान घातले आहे. त्यामुळे मका, बाजरी कणीस पावसात भिजून कणसाला कोंब फुटत आहेत. आधीच उत्पादनात घट झालेली असताना परतीच्या पावसाच्या पुन्हा आगमनामुळे शेतकºयांचे मका, बाजरी पिकांचे नुकसान झालेले आहे. कांदा पिकाची गेल्या दीड महिन्यापूर्वी शेतकºयांनी लागण केली आहे. कांदा पिकाचेदेखील पावसामुळे नुकसान होत आहे. कांदा पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. शासनाने शेतकºयांना पीक नुकसानभरपाई अनुदान द्यावे. सदर पिकांचा पंचनामा व्हावा तसेच पीक विमादेखील शेतकºयांनी काढलेला आहे. त्यांनाही पीक नुकसान विमा मंजूर करावा तसेच दिवाळीपूर्वी शासनाने सरसकट कर्ज माफ करावे अशी मागणी शेतकरी रमेश हिरे, भाऊसाहेब हिरे, संतोष सावंत, प्रभाकर सावंत, दिलीप निकम, विठ्ठल खैरनार आदींनी केली आहे.