मालेगाव : तालुक्यातील चिंचावड येथे शेताच्या सामाईक बांधावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या असून, एकाचा खून झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांत चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रमिला शिवाजी बोरसे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्र्यंबक काशीराम अहिरे, प्रदीप त्र्यंबक अहिरे, निर्मला त्र्यंबक अहिरे व सालदार बाळा (पूर्ण नाव माहीत नाही) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेताच्या सामाईक बांधाच्या कारणावरून चिंचावड शिवारात बोरसे व अहिरे या दोन गटांत वाद सुरू होता. प्रमिला बोरसे यांच्या शेतात ही घटना घडली. शेतातील झाडे तोडण्यावरून शिवाजी पांडुरंग बोरसे हे समजावून सांगण्यास गेले असता त्यांना चौघांनी केलेल्या मारहाणीत शिवाजी यांचा मृत्यू झाला.
चिंचावडला दोन गटांत हाणामारी
By admin | Updated: September 16, 2014 00:05 IST