शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

संपातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:51 IST

वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात सहभागी असणाºया कर्मचाºयांची माहिती राज्य परिवहन महामंडळाने मागविली आहे.

नाशिक : वेतन कराराला विरोध करीत पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत असतानाच आता राज्य परिवहन महामंडळाने आपला मोर्चा विनंती बदली मागणा-या कर्मचाºयांकडे वळविला आहे. ज्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत त्यापैकी संपात सहभागी असणाºया कर्मचाºयांची माहिती राज्य परिवहन महामंडळाने मागविली आहे.  गेल्या दोन वर्षांपासून परिवहन महामंडळातील वेतनाचा मुद्दा गाजत असून, वेतनाच्या प्रश्नावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वेतन करार जाहीर केल्यानंतर ८ आणि ९ रोजी राज्यात एस.टी. कर्मचाºयांनी अघोषित संप पुकारला होता. मात्र या संपाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. संप नेमका कोणत्या संघटनेने पुकारला याविषयी कुणी पुढेही आले नाही. या संपामुळे दोन दिवसात राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले, तर प्रवाशांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता पुकारण्यात आलेल्या संपामुळे प्रशासन आणि प्रवाशांचीही चांगलीच धावपळ झाली.  वेतन करारामुळे कर्मचाºयांना अपेक्षित आर्थिक लाभ होणार नसल्याचा आरोप करीत यामुळे कर्मचाºयांच्या पदरी निराशा पडल्याचे पडसाद उमटून संपाचा प्रकार घडला होता. मात्र कराराला विरोध करणाºयांपैकी कोणत्याही संघटनेने संपाची जबाबदारी स्वीकारली नसल्याने संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली होती. राज्यभरात अनेक कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली. आता परिवहन महामंडळाने आपला मोर्चा बदली मागणाºया कर्मचा-यांकडे वळविला असून, जे संपात सहभागी होते अशा कर्मचा-यांच्या बदलीला यामुळे खो बसणार असल्याचे एकूणच चित्र निर्माण झाले आहे.  राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापकांनी याप्रकरणी राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठवून विनंती बदली मागणाºया कर्मचाºयांची माहिती मागविली आहे. अघोषित संपाच्या कालावधीत संपात सहभागी असलेल्या कर्मचाºयांपैैकी पदनिहाय कोणकोणत्या कर्मचाºयांनी बदली मागितली आहे याची माहिती राज्यभरातून गोळा केली जातआहे. संपासारखा विषय अतिशय गंभीर असून, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभाग नियंत्रकांनी सोमवारपर्यंत कर्मचाºयांची नावे कळवावित, असे पत्र विभाग नियंत्रकांना प्राप्त झाले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ