शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

क्रिसीलचा प्रारूप अहवाल सादर : तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, इंधनसेस वाढीची शिफारस बससेवा कशीही चालवा, बोजा नाशिककरांवरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:11 IST

नाशिक : शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा प्रारूप शक्यता अहवाल क्रिसील या संस्थेने महापालिका आयुक्तांना सादर केला.

ठळक मुद्देबससेवेबाबतचा अंतिम अहवालमार्गावरील बसफेºयाही कमी

नाशिक : शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा प्रारूप शक्यता अहवाल क्रिसील या संस्थेने महापालिका आयुक्तांना सादर केला. अहवालानुसार, बससेवा कुणीही, कशीही चालविली तरी त्याचा काही प्रमाणात आर्थिक भार विविध कररूपाने नाशिककरांवरच पडणार आहे. बससेवा सुरू करताना तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, इंधनसेस यांसह मोटार व्हेइकल टॅक्समध्ये वाढ करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. दरम्यान, बससेवेबाबतचा अंतिम अहवाल येत्या ३१ जानेवारीपर्यंत सादर करण्याची सूचना आयुक्तांनी क्रिसीलला केली असून, त्यानंतर तो महासभेवर मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. शहर बससेवा हस्तांतरित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने नाशिक महापालिकेकडे लकडा लावला आहे. तूट कमी करण्यासाठी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत काही मार्गावरील बसफेºयाही कमी केल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौºयात महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी, त्यासाठी शासनाकडून सहकार्याची तयारी दर्शविली होती. महापालिकेने बससेवेबाबतचा शक्यता अहवाल तयार करण्यासाठी क्रिसील या संस्थेची नेमणूक केली होती. क्रिसीलला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, क्रिसीलने प्रारूप अहवाल आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सादर केला आहे. क्रिसीलने बससेवेबाबत तीन पर्याय सुचविले आहेत. त्यात, महापालिकेने परिवहन समिती स्थापन करून स्वत: चालवावी अथवा कंपनी स्थापन करावी अथवा पीपीपी तत्त्वावर सेवा चालवावी, या पर्यायांचा समावेश आहे. तीन पर्यायांपैकी कुठलाही पर्याय निवडला तरी, पहिल्या वर्षी २४ कोटी रुपये तूट भरून काढण्यासाठी महापालिकेवर आर्थिक भार येणारच आहे. त्यात, क्रिसीलने तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांकशुल्क, मोटर व्हेइकल टॅक्स, इंधनावर सेस लावण्याची शिफारस केलेली आहे. बससेवा कशीही चालविली तरी डेपो आणि टर्मिनस यांचा खर्चही मनपाला आपल्या तिजोरीतून सोसावा लागणार आहे. मात्र, महामंडळाचे टर्मिनल भाडेतत्त्वावर घेता येऊ शकते, अशीही सूचना करण्यात आली आहे. बससेवा चालविण्यासाठी ११६ कोटी रुपये भांडवली खर्च अपेक्षित धरला असून, आॅपरेशन व मेंटेनन्ससाठी वार्षिक ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. प्रामुख्याने तिकीट विक्रीपासून पहिल्या वर्षी ४६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे २४ कोटींची तूट भरून काढण्यासाठी मनपा असो अथवा कंपनी यांना विविध करांच्या माध्यमातून पैसा उभा करावा लागणार आहे. त्यामुळे, बससेवा कशीही-कोणीही चालविली तरी, काही प्रमाणात महापालिकेवर आर्थिक भार अटळ आहे.