शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय तुंगार यांच्या हत्येबाबत गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:11 IST

त्र्यंबकेश्वर : काल (दि.21) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची समीर गोंदके या मारेक-याने कथित पैशांच्या देवाण घेवाणीतुन निर्घृ हत्या करण्यात आली. त्याबद्दल गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावया हवी. तसेच पैशांची देवाण घेवाण होती की यामागे कोणी सूत्रधार आहे की काय ? हत्येमागचे निश्चित कारण काय याबाबतचा सखोल तपास निष्पक्ष करावा अशी मागणी आज नगरपरिषदे समोर झालेल्या शोकसभेत करण्यात आली.

ठळक मुद्दे हत्येच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वरला शोकसभा

त्र्यंबकेश्वर : काल (दि.21) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची समीर गोंदके या मारेक-याने कथित पैशांच्या देवाण घेवाणीतुन निर्घृ हत्या करण्यात आली. त्याबद्दल गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावया हवी. तसेच पैशांची देवाण घेवाण होती की यामागे कोणी सूत्रधार आहे की काय ? हत्येमागचे निश्चित कारण काय याबाबतचा सखोल तपास निष्पक्ष करावा अशी मागणी आज नगरपरिषदे समोर झालेल्या शोकसभेत करण्यात आली. या शोकसभेला शेकडो तुंगारप्रेमी जमले होते.प्रत्येकाच्या चेह-यावर तुंगार घराण्याचे राजकारण संपविणा-या नराधमास शिक्षा झालीच पाहिजे.असा निर्धार होता.वर्षही झाले नसताना अवघ्या सात महिन्यात तुंगार घराण्याचे तीन कर्ते धर्ते पुरुष गमावले.या शोक सभेस पुरुषोत्तम लोहगावकर उपनगराध्यक्ष संतोष कदम स्वप्निल शेलार गोविंदराव मुळे सुरेश गंगापुत्र भुषण अडसरे कैलास घुले बाळा साहेब सावंत युवराज कोठुळे राजेश घुले स्वप्निल (पप्पु) शेलार शिवसेना शहराध्यक्ष सचिन दिक्षित आर पी आयचे तालुकाध्यक्ष शांताराम बागुल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग डॉ.दिलीप जोशी काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर लांडे आदी उपस्थित होते.आपल्या भाषणात कैलास घुले म्हणाले आज तुंगार घराण्याचे तीन कर्तेपणा पुरुष गमावल्याने जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याची कल्पना करवत नाही. या सत्तेची चौकशी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना विनंती करावी. तर गोविंदराव मुळे म्हणाले कालचा दिवस काळा दिवस म्हणुन कायम स्मरणात राहील. या वेळी त्यांना गहिवरून आले. ते पुढे म्हणाले मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो. ही तुंगार कुटुंबियांची शोकांतिका म्हणावी. तर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज कोठुळे म्हणाले, अशी घटना पुन्हा होउ नये म्हणुन सर्वांनी खबरदारी घ्यावी. शिवसेना शहराध्यक्ष सचिन दीक्षित आपल्या भाषणात म्हणाले स्व.धनंजय तुंगार हे आक्रमक नेते होते. त्यांचे कुणाशी वैर नव्हते. काय बोलायचे ते स्पष्ट पणे तोंडावर बोलत. गुन्हेगारास कठोर शासन झाले पाहिजे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरुषोत्तम कडलग यांनी आपले मत परखड पणे मांडुन भाड्याने राहणारे भाडेकरु असे अनावश्यक लोकांची गर्दी झाली असुन भाईगिरी करतात.तसेच 15 वयोगटा पासुन ते 18 वर्षांची अल्पवयीन पिढी यांना चाप बसवला पाहिजे.आईबापांनीच मुलांचे फालतु लाड करु नये. 18 ते 20 पर्यंतची पिढी रोलेट नशेबाजी जुगार या दुर्व्यसनाच्या आहारी जात आहेत. भाईगिरी वाढली आहे. पोलीसांनी या गोष्टी आळा घालावा.कमी वयातील मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वहावत चालली आहे.नगरसेवक स्वप्निल शेलार म्हणालेत्र्यंबकेश्वर हे तिर्थक्षेत्र जगप्रसिध्द असल्याने येणारा भाविक सुरक्षित राहु शकतील का ? गावाची शांतता धोक्यात आली आहे.यावेळी मधुकर लांडे, डॉ.दिलीप जोशी पुरुषोत्तम लोहगावकर शांताराम बागुल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी सूत्रधाराच्या चौकशीची मागणी करुन पत्रकार व पोलीस प्रशासनाने पाळेमुळे शोधुन काढावीत.आता हे उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले व स.पो.नि.रामचंद्र कर्पे व त्यांच्या स्टाफचे आहे. सुदैवाने कार्यतत्पर नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधिक्षक प्रतिष्ठा वालावलकर लाभल्याने त्यांनीही या प्रकरणाकडेजातीने लक्ष घालावे. शेवटी त्र्यंबक वासियांतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी भिमाशंकर ढोले व सपोनि रामचंद्र कर्पे यांना गावाच्या वतीने एक निवेदन देउन गुन्हेगाराला कोर शिक्षा व्हावी. तसेच गुन्ह्याचा तपास निष्पक्ष करावा अशी विनंती करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :Murderखूनtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर