शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सिन्नरला टास्क फोर्सची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:06 IST

सिन्नर : कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यात टास्क फोर्सची निर्मिती ...

सिन्नर : कोरोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सिन्नर तालुक्यात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील आणि पोलीस कर्मचारी तर शहरात प्रभागातील दोन नगरसेवक, नगरपालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी आणि पोलीस किंवा गृहरक्षक दलाचे जवान अशा चौघांचा या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांचा या पथकात समावेश करण्यात आल्याने कायदा, सुव्यवस्था राखून कोरोनाला अटकाव करण्यास मदत होणार असल्याचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले.

सिन्नर शहरातील १४ प्रभाग आणि ग्रामीण भागातील ११४ गावांमध्ये टास्क फोर्सची टीम सज्ज करण्यात आल्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणावर पर्यवेक्षण करणे, सर्वेक्षण योग्यरितीने सुरू असल्याची खात्री करणे, कार्यक्षेत्रातील कोरोनाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करणे, कार्यक्षेत्रात संस्था विलगीकरण केंद्र सुरू करणे, पॉझिटिव्ह आढळलेल्या व गृह अलगीकरणासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना गृहभेट देऊन अशा व्यक्तींच्या घरी स्वतंत्र निवास व्यवस्था असल्याची व बाधित व्यक्ती घरातील इतर व्यक्तींच्या संपर्कात येणार नाहीत, अशा व्यवस्थेचे पालन होत असल्याची खात्री करणे, नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे, विलगीकरणाचे १४ दिवसांचे नियम पाळण्यासाठी संबंधितांना सूचना देणे, विलगीकरण केंद्राचे नियम पाळत नसल्यास संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्या मात्र १४ दिवसांपर्यंत विलगीकरणाचे नियम पाळत नसलेल्या व्यक्तींना पुन्हा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल करणे अशी कामे ही टीम करणार आहे.

त्याचबरोबर कडक कारवाईचे अधिकार

आस्थापनांकडून वेळेचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करणे, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना पायबंद घालणे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे, मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतराचे पालन होत असल्याची खात्री करणे, विवाहासाठी २५ व अंत्यविधीकरिता २०पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची दक्षता घेणे, कोरोनाबाधित व्यक्तींच्या रहिवास ठिकाणी २४ तासांच्या आत प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून अशा क्षेत्रातून व्यक्तींचे आवागमन प्रतिबंधित करणे, केवळ वैद्यकीय कामासाठी एक मार्ग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी या पथकावर सोपवण्यात आली आहे. ‘ब्रेक द चेन’ संकल्पनेनुसार या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड विधान कलम १८६०चे कलम १८८नुसार कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.