शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

निसर्गातूनच देव संकल्पनेची निर्मिती

By admin | Updated: March 27, 2017 01:00 IST

नाशिक : आदिमानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे,

नाशिक : आदिमानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे, असे मत नास्तिक विचारवादी व्याख्याते इरफान इंजिनिअर यांनी व्यक्त केले.  निसर्गातील आपत्कालीन समयी भीतीने तत्कालीन परिस्थितीत मानवाने कर्मकांडाला प्राधान्य दिले. असे कर्मकांड घडवून आणणारे पुढे धार्मिक स्थळांच्या माध्यमातून ईश्वर आणि ईश्वरवादी धर्माच्या आधारे इतरांना निसर्गातील या वस्तुस्थितीपासून दूर ठेवत अज्ञानात ढकलू लागले. यातील ज्यांनी बंड करून या ब्रह्मांडातील सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची गाथा पाण्यात बुडविणारे याच विचारधारेचे पाईक होते, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नाशिक येथे विवेकधारा ग्रुपतर्र्फे शहीद भगतसिंग स्मृतिदिन आणि नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नास्तिकांच्या ब्राइट संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्त्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे उपस्थित होते. इरफान इंजिनिअर म्हणाले, ज्यांनी निसर्गाच्या शक्ती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा म्हणून हीन वागणूक देण्यात आली. या स्थितीतून सत्य परिस्थितीचा विचार जगासमोर मांडणारे नास्तिक म्हणवले गेले. परंतु, विज्ञानाची प्रगती अशाच नास्तिकांमुळे झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या नाकारणे म्हणजे नास्तिक. नास्तिकतेचा हाच विचार जगाला ज्ञानसंपन्न करू पाहत आहे. देवाच्या अस्तित्वाचा पुरावा आतापर्यंत कोणीही देऊ शकलेला नाही. धर्म सत्ताकेंद्र होत असताना भ्रष्ट व्यवहाराबरोबरच दुर्बल घटकांवर अन्याय होतो, याची प्रचिती आली आहे. परंतु, मानवाची जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तसे ते प्रयत्नही कमी कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)