शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निसर्गातूनच देव संकल्पनेची निर्मिती

By admin | Updated: March 27, 2017 01:00 IST

नाशिक : आदिमानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे,

नाशिक : आदिमानवाने जंगलात जीवन जगताना निसर्गाच्या शक्तींना देवत्व प्रदान केल्याने समाजात देव ही संकल्पना निर्माण झाली असून, आज वेगवेगळ्या धर्मांत मान्यता मिळालेले देव हे निसर्गातील विविध शक्तीच आहे, असे मत नास्तिक विचारवादी व्याख्याते इरफान इंजिनिअर यांनी व्यक्त केले.  निसर्गातील आपत्कालीन समयी भीतीने तत्कालीन परिस्थितीत मानवाने कर्मकांडाला प्राधान्य दिले. असे कर्मकांड घडवून आणणारे पुढे धार्मिक स्थळांच्या माध्यमातून ईश्वर आणि ईश्वरवादी धर्माच्या आधारे इतरांना निसर्गातील या वस्तुस्थितीपासून दूर ठेवत अज्ञानात ढकलू लागले. यातील ज्यांनी बंड करून या ब्रह्मांडातील सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची गाथा पाण्यात बुडविणारे याच विचारधारेचे पाईक होते, असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नाशिक येथे विवेकधारा ग्रुपतर्र्फे शहीद भगतसिंग स्मृतिदिन आणि नास्तिक मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर नास्तिकांच्या ब्राइट संघटनेचे संस्थापक कुमार नागे, निखिल जोशी, चैताली शिंदे, प्रमोद सहस्त्रबुद्धे, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे, उद्योजक संदीप भावसार आणि विवेकधाराचे प्रवर्तक अमित जोजारे उपस्थित होते. इरफान इंजिनिअर म्हणाले, ज्यांनी निसर्गाच्या शक्ती समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा म्हणून हीन वागणूक देण्यात आली. या स्थितीतून सत्य परिस्थितीचा विचार जगासमोर मांडणारे नास्तिक म्हणवले गेले. परंतु, विज्ञानाची प्रगती अशाच नास्तिकांमुळे झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत, त्या नाकारणे म्हणजे नास्तिक. नास्तिकतेचा हाच विचार जगाला ज्ञानसंपन्न करू पाहत आहे. देवाच्या अस्तित्वाचा पुरावा आतापर्यंत कोणीही देऊ शकलेला नाही. धर्म सत्ताकेंद्र होत असताना भ्रष्ट व्यवहाराबरोबरच दुर्बल घटकांवर अन्याय होतो, याची प्रचिती आली आहे. परंतु, मानवाची जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तसे ते प्रयत्नही कमी कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)