शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

वासंती माळी यांना न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: January 17, 2017 01:50 IST

वासंती माळी यांना न्यायालयाचा दिलासा

नाशिक : अधिकार नसताना नवीन शर्र्तीच्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांना परवानगी देण्याच्या कारणास्तव नांदगाव तालुक्यातील तत्कालीन तहसीलदारासह २३ जणांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्णात सोमवारी (दि़१६) मुंबई उच्च न्यायालयाने येवल्याच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी यांना ३० जानेवारीपर्यंत दिलासा दिला आहे़दिनांक ५ जानेवारी रोजी नांदगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक हेमंत भामरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती़ नांदगावचे तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन यांनी अधिकार नसताना नवीन शर्थीच्या जमिनींचे व्यवहार करण्यास अनुमती दिली व त्यातून शासनाचा सुमारे पावणेचार कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा या फिर्यादीत करण्यात आला होता़  लाचलुचपत खात्याच्या या कारवाईविरोधात माळी यांनी मालेगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता़ मात्र तो फेटाळण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली़ त्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनावर गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्यासमोर सुनावणी झाली़ त्यावेळी सरकार पक्षाची पुरेशी तयारी नसल्याने सोमवारपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते़ सोमवारी यावर पुन्हा न्यायमूर्ती भाटकर यांच्यासमोर अ‍ॅड़ अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला असता सरकार पक्षातर्फे पुन्हा कागदपत्र व पुरेशी तयारी नसल्याचे कारण देत पुन्हा दोन आठवड्यांची मुदत मागून घेण्यात आली़ त्यामुळे माळी यांना दिलासा मिळाला असून, न्यायालयाने दैनंदिन कामकाजासाठी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देशही दिले आहेत़