शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

देशाची वाटचाल अराजकतेकडे

By admin | Updated: January 6, 2017 00:44 IST

शरद पवार : राष्ट्रवादीच्या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्यावर टीका

 नाशिक : नोटबंदीच्या निर्णयाने शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक, उद्योजक अशा समाजातील प्रत्येक घटकालाच फटका बसला आहे. हा निर्णय कोणी एकट्याने घेतला की सामूहिक होता हे समजू शकलेले नसले तरी, हा सत्तेचा अधिकार केंद्रित करण्याचा एक भाग आहे. ज्या ठिकाणी मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित होते तेव्हा ती भ्रष्ट होत जाते व अशी सत्ता घेत असलेले निर्णयही देशाला अराजकतेकडे नेतात, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. पवार पुढे म्हणाले, देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेले आॅपरेशन योग्य असले तरी, आॅपरेशननंतर ज्या पद्धतीने रुग्णाची काळजी घ्यायला हवी तसे न झाल्यामुळे रुग्ण दगावण्याचीच भीती आहे असे सांगून, पंतप्रधान मोदी जेव्हा दूरदर्शनवरून महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे जाहीर झाले तेव्हा असे वाटले की पठाणकोट, उरी व लष्कराच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे ते पाकिस्तानबद्दल ठोस निर्णय घेतील, परंतु त्यावर भाष्य न करता त्यांनी देशातील ८६ टक्के चलन रद्दी झाले म्हणून जाहीर केले. हे सांगत असताना पवार यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडण्यापूर्वी आकाशवाणीवरून देशाला संबोधित केले होते याची आठवण करून दिली. देशातील काळा पैसा नष्ट करण्याच्या विषयावर एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा झाली होती. सध्याचे राष्ट्रपती व तत्कालीन वित्तमंत्र्यांनी त्यावेळी ७७ हजार कोटी रुपये काळा पैसा असल्याचे सांगितले होते. आत्ताच्या राजवटीत एक लाख ८६ हजार कोटी रुपये काळा पैसा चलनात फिरतो, असे सरकारचे म्हणणे आहे व म्हणून ते चलनातून रद्द केले, असे समर्थन केले जात असेल तर त्यातील ९८ टक्के रक्कम आता बॅँकेत जमा झाल्याचे प्रसिद्ध होत असल्यामुळे देशात नेमका किती काळा पैसा आहे, असा सवालही पवार यांनी केला.