शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:57 IST

गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली

नाशिक : गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली असून, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया २७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश असल्याचे सांगून निवडणुकीशी संबंधित महसूल अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारच्या रजा मंजुरीवर मज्जाव घालण्यात आला आहे.या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्तसहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना पत्र पाठवून आयोगाच्या पत्राची जाणीव करून दिली आहे.लोकसभा निवडणुकीचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्यापासून ते मतदार यादी तयार करणे, मतदारांपर्यंत ओळखपत्र, निवडणूक चिठ्या पोहोचविण्यापर्यंत त्याचबरोबर मतदान केंद्राची सर्व तयारी करण्यात महसूल अधिकारी व कर्मचारी गेल्या दीड महिन्यांपासून गुंतून पडले होते. या काळात त्यांना साप्ताहिक सुटी अथवा घोषित झालेल्या शासकीय सुट्याही घेणे अवघड होऊन बसले होते. निवडणूक कामाला प्राधान्य देण्याचे आयोगाचे आदेश असल्याने महसूल अधिकारी, कर्मचाºयांनी लोकसभा निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडली.मतदानाच्या दिवशी व दुसºया दिवशी सलग ४८ तास काम केलेल्या या अधिकारी, कर्मचाºयांनी निवडणूक आटोपल्यानंतर मात्र थकवा घालविण्यासाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी जाण्याची तयारी करून मुख्यालय सोडण्याची परवानगीही घेतली, तर काहींनी नातेवाइकांच्या लग्न समारंभासाठी सुट्या टाकल्या. परंतु, त्यांच्या सुटीवर जाण्याने निवडणूक संदर्भातील कामे खोळंबू लागल्याचे निदर्शनास आले आहे.आयोगाकडून मतदान व मतमोजणी संदर्भातील कोणतीही माहिती तत्काळ मागविली जात असून, संबंधित अधिकारी, कर्मचारी रजेवर गेल्यामुळे माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे पाहून यापुढे उप जिल्हा निवडणूक अधिकाºयांची पूर्व परवानगीशिवाय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक कामाशी नियुक्त केलेले नायब तहसीलदार, लिपिक यांच्या रजा मंजूर करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या या सूचनेमुळे रजेवर गेलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना परत बोलविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिक