शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

‘जीपीएस’च्या वापराने वनजमिनीची मोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:52 IST

नाशिक : जिल्ह्णातील वनहक्क दाव्यांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी सन २००५ पूर्वीचे वनजमिनीवरील अतिक्रमण मोजण्यासाठी जीपीएस यंत्राचा वापर करण्यात येऊन येत्या सहा महिन्यांत सर्व प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली. जिल्ह्णात सहा हजाराहून अधिक वनदावे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

ठळक मुद्दे राधाकृष्णन् : सहा महिन्यांत सर्व दाव्यांचा निपटारा मोजणी केलेल्या व प्रत्यक्ष ताबा असलेल्या क्षेत्रात मोठी तफावत

नाशिक : जिल्ह्णातील वनहक्क दाव्यांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी सन २००५ पूर्वीचे वनजमिनीवरील अतिक्रमण मोजण्यासाठी जीपीएस यंत्राचा वापर करण्यात येऊन येत्या सहा महिन्यांत सर्व प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली. जिल्ह्णात सहा हजाराहून अधिक वनदावे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. वनहक्क कायद्यान्वये आदिवासींनी दाखल केलेल्या दाव्यांचा निपटारा व्हावा यासाठी गेल्या महिन्यात किसान सभेने नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढला, त्यावर सरकारने येत्या सहा महिन्यांत सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यापार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्णातील वनहक्क दाव्यांवर निर्णय घेण्यासाठी दोन अपर जिल्हाधिकाऱ्यांना कामाचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. याबाबतच्या समितीच्या बैठका आता नियमितपणे होतील. सन २००५ मध्ये आदिवासींच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमित जमिनी त्यांच्या नावे करण्याच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत वनजमिनीची मोजणी हाच कळीचा मुद्दा आहे.जिल्हाधिकाºयांनी सांगितले की, साडेसहा हजार दावे अद्याप प्रलंबित असून, त्यात प्रामुख्याने मोजणीचाच मुद्दा महत्त्वाचा आहे. ती मोजणी एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी जीपीएस यंत्राचा वापर केला जाणार आहे. येत्या सहा महिन्यांत सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर फेर चौकशीसाठी पाठविलेल्या दाव्यांवरही उपविभागीय अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. समितीच्या अध्यक्षपदी दोन अपर जिल्हाधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.मोजणी व ताबा क्षेत्रात मोठी तफावतयापूर्वीही जीपीएसच्या माध्यमातून सन २००५ मध्ये असलेल्या अतिक्रमणांचे उपग्रहाच्या माध्यमातून छायाचित्रे घेऊन मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यात अपयश आले होते. जीपीएसच्या सहाय्याने केलेल्या मोजणीबाबत आदिवासींच्या तक्रारी असून, सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या अतिक्रमित क्षेत्राचाच त्यांना ताबा मिळावा, असा त्यांचा आग्रह आहे. प्रशासनाने यापूर्वी मोजणी केलेल्या व प्रत्यक्ष ताबा असलेल्या क्षेत्रात मोठी तफावत आहे ती दूर करण्याची आदिवासींची प्रमुख मागणी आहे.