शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मोजणीत अडकला वन कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:39 IST

नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असली तरी, आदिवासींच्या ताब्यात प्रत्यक्ष असलेली जमीन व जिल्हास्तरीय समितीने देऊ केलेल्या जमिनीचा ताबा याच्यातील तफावतीमुळेच गेल्या दहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.उद्रेक मुंबईपर्यंत काढलेल्या पायी मोर्चातून झाला

नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असली तरी, आदिवासींच्या ताब्यात प्रत्यक्ष असलेली जमीन व जिल्हास्तरीय समितीने देऊ केलेल्या जमिनीचा ताबा याच्यातील तफावतीमुळेच गेल्या दहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेलीनाही.नाशिक जिल्ह्णात वनहक्क कायद्यान्वये प्रारंभी ५०,४४३ दावे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी उपविभागीय अधिकाºयांकडे ४९,७६९ दावे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील फक्त १८,२३५ दावे उपविभागीय अधिकाºयांनी मान्य करून सुमारे ३१,५३४ दावे नामंजूर करण्यात आले. उपविभागीय अधिकाºयांनी त्यांच्याकडील १८,२३५ दावे जिल्हास्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविले असता, समितीने त्यातील १७,५५१ दावे मंजूर केले व ६८४ दावे नामंजूर केले. जिल्हास्तरीय समितीने त्यातील ९७५ आदिवासींना प्रत्यक्षात ताबा प्रमाणपत्र तयार करून २६,८९९ एकर जागा आदिवासींच्या ताब्यात दिली आहे.परंतु अशी जागा ताब्यात देताना आदिवासींचा प्रत्यक्षात जमिनीवर असलेला ताबा व जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले क्षेत्र यात प्रचंड तफावत निर्माण झाल्यामुळे आदिवासींनी ताबा प्रमाणपत्र स्वीकारण्यास नकार दिला व फेरमोजणीची मागणी केली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून किसान सभेच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, इगतपुरी या तालुक्यांतील आदिवासींनी वेळोवेळी मोर्चे, रास्ता रोको, धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. आदिवासींना त्यांच्या ताब्यातील जमिनीची नोंद सातबारा उताºयावर होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासकीय मदतीपासूनही वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता व त्यातूनच त्याचा उद्रेक मुंबईपर्यंत काढलेल्या पायी मोर्चातून झाला आहे.