शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मोजणीत अडकला वन कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:39 IST

नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असली तरी, आदिवासींच्या ताब्यात प्रत्यक्ष असलेली जमीन व जिल्हास्तरीय समितीने देऊ केलेल्या जमिनीचा ताबा याच्यातील तफावतीमुळेच गेल्या दहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.उद्रेक मुंबईपर्यंत काढलेल्या पायी मोर्चातून झाला

नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असली तरी, आदिवासींच्या ताब्यात प्रत्यक्ष असलेली जमीन व जिल्हास्तरीय समितीने देऊ केलेल्या जमिनीचा ताबा याच्यातील तफावतीमुळेच गेल्या दहा वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेलीनाही.नाशिक जिल्ह्णात वनहक्क कायद्यान्वये प्रारंभी ५०,४४३ दावे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी उपविभागीय अधिकाºयांकडे ४९,७६९ दावे तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील फक्त १८,२३५ दावे उपविभागीय अधिकाºयांनी मान्य करून सुमारे ३१,५३४ दावे नामंजूर करण्यात आले. उपविभागीय अधिकाºयांनी त्यांच्याकडील १८,२३५ दावे जिल्हास्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठविले असता, समितीने त्यातील १७,५५१ दावे मंजूर केले व ६८४ दावे नामंजूर केले. जिल्हास्तरीय समितीने त्यातील ९७५ आदिवासींना प्रत्यक्षात ताबा प्रमाणपत्र तयार करून २६,८९९ एकर जागा आदिवासींच्या ताब्यात दिली आहे.परंतु अशी जागा ताब्यात देताना आदिवासींचा प्रत्यक्षात जमिनीवर असलेला ताबा व जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले क्षेत्र यात प्रचंड तफावत निर्माण झाल्यामुळे आदिवासींनी ताबा प्रमाणपत्र स्वीकारण्यास नकार दिला व फेरमोजणीची मागणी केली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून किसान सभेच्या माध्यमातून पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल, इगतपुरी या तालुक्यांतील आदिवासींनी वेळोवेळी मोर्चे, रास्ता रोको, धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. परंतु प्रत्येक वेळी त्यांना आश्वासनाच्या पलीकडे काहीच मिळाले नाही. आदिवासींना त्यांच्या ताब्यातील जमिनीची नोंद सातबारा उताºयावर होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासकीय मदतीपासूनही वंचित राहावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला होता व त्यातूनच त्याचा उद्रेक मुंबईपर्यंत काढलेल्या पायी मोर्चातून झाला आहे.