शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

मोजणीचे क्षेत्र, ताब्यातील क्षेत्रातील तफावतीचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:35 IST

नाशिक : जिल्ह्णातील साडेसतरा हजार आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वन जमिनीचा ताबा देण्यास कोणाची हरकत नसली तरी, प्रत्यक्षात आदिवासींच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यांना देण्यात आलेल्या ताबा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील तफावतीच्या घोळामुळेच गेल्या आठ वर्षांपासून जिल्ह्णातील आदिवासींचे सातबारा उताºयावर नाव लागत नसल्याची बाब उघडकीस आली असून, या साºया घोळास वन खातेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवनहक्काची फरफट : वन खात्याचाच मोठा अडसरगेल्या अनेक वर्षांपासून हा घोळ सुरू

नाशिक : जिल्ह्णातील साडेसतरा हजार आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वन जमिनीचा ताबा देण्यास कोणाची हरकत नसली तरी, प्रत्यक्षात आदिवासींच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यांना देण्यात आलेल्या ताबा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील तफावतीच्या घोळामुळेच गेल्या आठ वर्षांपासून जिल्ह्णातील आदिवासींचे सातबारा उताºयावर नाव लागत नसल्याची बाब उघडकीस आली असून, या साºया घोळास वन खातेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाने २००५ मध्ये ज्या जमिनीवर आदिवासींनी अतिक्रमण केले आहे ते क्षेत्र त्याच्या नावे करण्यासाठी वनहक्क कायद्याला मंजुरी दिल्यापासून जिल्ह्णातील वन जमिनींवर आदिवासींनी केलेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करून त्यासाठी त्यांच्याकडून दाव्यांसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. सर्व पडताळण्या व छाननीनंतर १७५५१ प्रकरणांना जिल्हास्तरीय समितीने मान्यता देऊन त्यांना अतिक्रमित जमिनींचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कमी जमिनीचा ताबा आदिवासींना देण्यात आला आहे. कायद्यानुसार आदिवासींच्या ताब्यात असलेली अतिक्रमित जमीन त्याला देणे अपेक्षित असल्याने व ती मिळत नसल्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून हा घोळ सुरू आहे.मध्यंतरी शासनाने २००८ मध्ये या कायद्यात दुरुस्ती सुचविणारा अध्यादेश काढून त्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु वन खात्याकडे एकूण असलेल्या जमिनीपैकी किती जमिनीवर आदिवासींनी अतिक्रमण केले याची अद्ययावत माहिती असतानाही त्यांनी ती स्वत:कडे दडवून ठेवली. परिणामी आदिवासींच्या अतिक्रमित जागेचा पंचनामा व टेबल मोजणी करून त्यांना ताबा प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र त्या संदर्भात आदिवासींनी हरकत घेतल्यामुळे जिल्हास्तरीय समितीने त्यांना फेर मोजणीत वाढीव क्षेत्र देण्याचे कबूल केले. परंतु वन खात्याने प्रत्येक दाव्यावर आदिवासीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी त्याच्या अतिक्रमणाचे उपग्रह छायाचित्राची खात्री करावी, अशी टिपणी टाकून ठेवली. उपग्रह छायाचित्रे उपलब्ध नाहीउपग्रह छायाचित्रेच उपलब्ध नसल्यामुळे आदिवासींनी वाढीव क्षेत्र मंजूर करूनही जिल्हास्तरीय समितीकडून त्याचे मालकी हक्क प्रमाणपत्र देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एक तर वन खात्याने मूळ दाव्यावर नोंदविलेली टिपणी रद्द करण्यात यावी किंवा जिल्हास्तरीय समितीने स्वअधिकारात आदिवासींना त्यांचे वाढीव तफावतीतील क्षेत्र मंजूर करावे, अशी मागणी केली जात आहे.