शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोजणीचे क्षेत्र, ताब्यातील क्षेत्रातील तफावतीचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:35 IST

नाशिक : जिल्ह्णातील साडेसतरा हजार आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वन जमिनीचा ताबा देण्यास कोणाची हरकत नसली तरी, प्रत्यक्षात आदिवासींच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यांना देण्यात आलेल्या ताबा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील तफावतीच्या घोळामुळेच गेल्या आठ वर्षांपासून जिल्ह्णातील आदिवासींचे सातबारा उताºयावर नाव लागत नसल्याची बाब उघडकीस आली असून, या साºया घोळास वन खातेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवनहक्काची फरफट : वन खात्याचाच मोठा अडसरगेल्या अनेक वर्षांपासून हा घोळ सुरू

नाशिक : जिल्ह्णातील साडेसतरा हजार आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वन जमिनीचा ताबा देण्यास कोणाची हरकत नसली तरी, प्रत्यक्षात आदिवासींच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यांना देण्यात आलेल्या ताबा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील तफावतीच्या घोळामुळेच गेल्या आठ वर्षांपासून जिल्ह्णातील आदिवासींचे सातबारा उताºयावर नाव लागत नसल्याची बाब उघडकीस आली असून, या साºया घोळास वन खातेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.शासनाने २००५ मध्ये ज्या जमिनीवर आदिवासींनी अतिक्रमण केले आहे ते क्षेत्र त्याच्या नावे करण्यासाठी वनहक्क कायद्याला मंजुरी दिल्यापासून जिल्ह्णातील वन जमिनींवर आदिवासींनी केलेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करून त्यासाठी त्यांच्याकडून दाव्यांसाठी अर्ज भरून घेण्यात आले होते. सर्व पडताळण्या व छाननीनंतर १७५५१ प्रकरणांना जिल्हास्तरीय समितीने मान्यता देऊन त्यांना अतिक्रमित जमिनींचा ताबा देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कमी जमिनीचा ताबा आदिवासींना देण्यात आला आहे. कायद्यानुसार आदिवासींच्या ताब्यात असलेली अतिक्रमित जमीन त्याला देणे अपेक्षित असल्याने व ती मिळत नसल्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून हा घोळ सुरू आहे.मध्यंतरी शासनाने २००८ मध्ये या कायद्यात दुरुस्ती सुचविणारा अध्यादेश काढून त्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु वन खात्याकडे एकूण असलेल्या जमिनीपैकी किती जमिनीवर आदिवासींनी अतिक्रमण केले याची अद्ययावत माहिती असतानाही त्यांनी ती स्वत:कडे दडवून ठेवली. परिणामी आदिवासींच्या अतिक्रमित जागेचा पंचनामा व टेबल मोजणी करून त्यांना ताबा प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र त्या संदर्भात आदिवासींनी हरकत घेतल्यामुळे जिल्हास्तरीय समितीने त्यांना फेर मोजणीत वाढीव क्षेत्र देण्याचे कबूल केले. परंतु वन खात्याने प्रत्येक दाव्यावर आदिवासीचे क्षेत्र निश्चित करण्यासाठी त्याच्या अतिक्रमणाचे उपग्रह छायाचित्राची खात्री करावी, अशी टिपणी टाकून ठेवली. उपग्रह छायाचित्रे उपलब्ध नाहीउपग्रह छायाचित्रेच उपलब्ध नसल्यामुळे आदिवासींनी वाढीव क्षेत्र मंजूर करूनही जिल्हास्तरीय समितीकडून त्याचे मालकी हक्क प्रमाणपत्र देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एक तर वन खात्याने मूळ दाव्यावर नोंदविलेली टिपणी रद्द करण्यात यावी किंवा जिल्हास्तरीय समितीने स्वअधिकारात आदिवासींना त्यांचे वाढीव तफावतीतील क्षेत्र मंजूर करावे, अशी मागणी केली जात आहे.