शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

युनोत भारताच्या सदस्यत्वासाठी काठमांडूत परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 16:37 IST

नाशिक : संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमानस तयार करण्याच्या उद्देशाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय समरसता मंचतर्फे काठमांडू येथे २८ डिसेंबरला २० देशांतील नागरिकांची आंतरराष्ट्रीय परिषद अयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया व्यक्तींचा समावेश असून, महाराष्ट्रातून सहभागी होणाºया १२५ तज्ज्ञांच्या ...

नाशिक : संयुक्त राष्ट्रात भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमानस तयार करण्याच्या उद्देशाने इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय समरसता मंचतर्फे काठमांडू येथे २८ डिसेंबरला २० देशांतील नागरिकांची आंतरराष्ट्रीय परिषद अयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाºया व्यक्तींचा समावेश असून, महाराष्ट्रातून सहभागी होणाºया १२५ तज्ज्ञांच्या समितीचे नेतृत्व गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य डॉ. एम. एम. गोसावी करणार आहेत. डॉ. गोसावी यांच्यावर प्रमुख सल्लागाराची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती नेपाळच्या उपराष्ट्रपतींचे सल्लागार महावीर तोरडी यांनी दिली.सपट अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तोरडी म्हणाले, सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रात मताधिकार अधिकारांसह कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यासाठी मित्रराष्ट्रांना प्रोत्साहित करून त्यांचे समर्थन प्राप्त करणे गरजेचे आहे. समरसता अभियांनाच्या माध्यमातून आतापर्यंत वीस देशांना प्रोत्साहित करण्यात आले असून यात अफगाणिस्तान, अल्जेरिया, एंगोला, आॅस्ट्रिया, क्रोटीया, फिनलँड, फिन्नीश, जर्मन, इराक, इस्त्रायल, मैकडोनिया, मोरक्को, नेदरलँड, नायजेरिया, नॉर्वेजियन, रोमानिया, तुनिशिया, नेपाळ आणि भूतान या राष्ट्रांचा समावेश आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारत आणि नेपाळच्या असलेल्या समतुल्य परंपरांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत आशिया खंडाचे नेतृत्व चीनऐवजी भारताकडे सोपविण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरात भारत आठवे शक्तिशाली राष्ट्र असताना एक शांतीपूर्ण राष्ट्र अशी भारताची ओळख आहे. भारतातील ऊर्जा, संरक्षण शक्ती, लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणातून देशाला ताकद मिळत असून, जगभरात भारताची सैन्य शक्ती सातव्या, ऊर्जाक्षमता विसाव्या आणि परराष्ट्र व्यवहार ११व्या स्थानी आहे. पहिल्या महायुद्धात भारताचे साडेसात हजार शांतता सैनिक शहीद झाले असून, सध्याही भारताचे सर्वाधिक शांतता सैनिक आहेत. त्यामुळेच सुरक्षा परिषदेतील अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स यांच्यासोबत आशियाचे नेतृत्व करणाºया चीनऐवजी भारताला स्थान मिळावे, असा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे तोरडी यांनी सांगितले.