शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पूरक आहार योजनेत भ्रष्टाचार?

By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST

पूरक आहार योजनेत भ्रष्टाचार?

न्यायडोंगरी : शासनाच्या वतीने किशोरवयीन मुली व महिलांसाठी राबविलेल्या विविध योजनाच त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची बाब न्यायडोंगरीत उघड झाली आहे. विशेषत: किशोरवयीन मुलींच्या आहार योजनेच्या अंमलबजावणीमध्येच गौडबंगाल असून, याबाबत प्रकल्प अधिकारी अन् जिल्ह्याच्या महिला व बालविकास सभापतीच मौन बाळगून असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. यात विशेषत: ११ ते १८ वयोगटांतील शाळेत न जाणाऱ्या व १५ ते १८ वयोगटांतील शाळेत जाणाऱ्या किशोरवयीन मुलींसाठी पूरक आहार योजना ग्रामीण भागासाठी राबविली जात आहे. सदरच्या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींच्या सुदृढतेसाठी पूरक आहार पुरविला जातो. मात्र, जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीमध्ये सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्येच गौडबंगाल होत असल्याचा संशय व्यक्तकेला जात आहे. किशोरवयीन मुलींसाठीच्या पूरक आहार योजनेअंतर्गत पुण्याच्या जननी महिला मंडळाच्या वतीने एका किशोरवयीन लाभार्थ्यांसाठी दोन किलो चना, दीड किलो चवळी, ५० ग्रॅम जिरे, ५०० ग्रॅम मीठ, १५० ग्रॅम हळद, १५० ग्रॅम मिरची पावडर, ५० ग्रॅम मोहरी व २०० मि.मी. तेल असा आहार पुरविला जातो. मात्र, याचरीतीने पूरक आहार दिला जात असल्याची कोणतीही सुसूत्रता नसल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबत संशय व्यक्तकेला जात आहे. मुळात लाभार्थी निवड प्रक्रियेलाच हरताळ फासला गेला आहे. शासनाच्या योजनेत शाळेत जाणाऱ्या व न जाणाऱ्या अशा दोन वर्गवारी स्पष्टपणे केल्या गेलेल्या असताना केवळ न जाणाऱ्या किशोरवयीन मुलींनाच योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच, लाभार्थी किशोरवयीन मुलीस दोन किलो चना ऐवजी एक किलो, तर दीड किलो चवळीऐवजी एक किलो चवळी दिली जात आहे. पूरक आहार पुस्तिकेच्या कोऱ्या पानावर लाभार्थ्याची स्वाक्षरी घेतली जात आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेचीच अंमलबजावणी होत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे, तर याबाबत प्रकल्प अधिकारी व महिला व बालकल्याण विभाग सभापती मौन बाळगून असल्याने आश्चर्य व्यक्तकेले जात आहे. (वार्ताहर)