शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

कोथिंबिरीचे बियाणे सदोष

By admin | Updated: May 29, 2017 00:11 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कोथिंबिरीचे बियाणे हे सदोष निघाले असून, शेतकऱ्यांचे यात नुकसान झालेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिळकोस : कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी घेतलेले कोथिंबिरीचे बियाणे हे सदोष निघाले असून, शेतकऱ्यांचे यात नुकसान झालेले आहे. कोथिंबीर ही तीस दिवसांची झाल्यावर तिला मोठ्या प्रमाणात तुरे (डोंगळे, फुले) आल्याने व्यापारी ही कोथिंबीर घेत नसून, भांडवल उभे करून घेतलेले पीक मातीमोल भावाने विकावे लागणार असल्याने अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. जुनी बेज येथील शेतकऱ्यांनी कळवणहून बियाणे खरेदी केले होते. या बियाण्यांपासून पिकविलेल्या कोथिंबिरीला तुरे (डोंगळे, फुले) आल्याने व्यापारी घेत नसल्याने या बियाण्यात फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे मत असून, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री झाल्याबाबत कळवण कृषी विभागाकडे संबंधित कंपनीविरोधात शेतकरी बांधवांनी तक्रार केली  आहे. जुनी बेज येथील शेतकरी विनोद खैरनार, मुरलीधर बागुल, भरत बच्छाव, जगदीश बच्छाव, रमेश बच्छाव, नरेंद्र बच्छाव, दीपक बच्छाव, प्रशांत बच्छाव या आठ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी व बोगस बियाणे कंपनी व कळवण येथील बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर कारवाई व्हावी, असे कृषी विभागाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.