शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार-अपर जिल्हाधिकाऱ्यांमध्ये पत्रापत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:58 IST

नाशिक : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूमाफियांनी गाड्या पळवून नेल्याच्या घटनेने हादरलेल्या महसूल खात्यात आता मालेगाव तहसीलदार व अपर जिल्हाधिकारी यांच्यात पत्रापत्रीची लढाई सुरू झाली असून, या साºया प्रकरणात तहसीलदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीदेखील वाळूमाफियांच्या कृत्यात सहभागी झाल्याचा आरोप अपर जिल्हाधिकाºयांनी केला आहे. तर त्याला उत्तर देताना तहसीलदारांनीही अपर जिल्हाधिकाºयांना असलेल्या कायदेशीर ज्ञानाचे वाभाडे काढले आहेत. या पत्रापत्रीमुळे मालेगावच्या महसूल कर्मचाºयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

ठळक मुद्देवाळूगाड्या प्रकरणएकमेकांवर दोषारोपाची चढाई

नाशिक : मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून वाळूमाफियांनी गाड्या पळवून नेल्याच्या घटनेने हादरलेल्या महसूल खात्यात आता मालेगाव तहसीलदार व अपर जिल्हाधिकारी यांच्यात पत्रापत्रीची लढाई सुरू झाली असून, या साºया प्रकरणात तहसीलदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारीदेखील वाळूमाफियांच्या कृत्यात सहभागी झाल्याचा आरोप अपर जिल्हाधिकाºयांनी केला आहे. तर त्याला उत्तर देताना तहसीलदारांनीही अपर जिल्हाधिकाºयांना असलेल्या कायदेशीर ज्ञानाचे वाभाडे काढले आहेत. या पत्रापत्रीमुळे मालेगावच्या महसूल कर्मचाºयांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.मालेगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून १९ मार्च रोजी मध्यरात्री वाळूमाफियांनी दहा वाळूच्या गाड्या पळवून नेल्याची घटना दुसºया दिवशी उघडकीस आली होती. या प्रकरणी प्रारंभी कार्यालयातील शिपायाने छावणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. परंतु त्यांच्या या कृत्यास जिल्हाधिकाºयांनी आक्षेप घेत तहसीलदारांनी तक्रार नोंदवावी अशी तंबी दिल्यानंतर ज्योती देवरे यांनी तक्रार दाखल केली होती. या साºया प्रकरणात महसूल खात्याची इभ्रत चव्हाट्यावर आल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली. वाळूमाफियांनी केलेली हिंमत पाहता त्यांच्या या कृत्यास महसूल अधिकारी व कर्मचाºयांची फूस असण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, त्याच आधारे अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी यासंदर्भात तहसीलदार देवरे यांना पत्र पाठवून जाब विचारला आहे. यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दाखल करताना आरोपींविरुद्ध कठोर कलमे नमूद करणे आवश्यक असतानाही जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आल्याचे दिसत असल्याचे पत्रात म्हटले असून, सदर पळवून नेलेल्या वाहनांबाबत आपण स्वत: काय चौकशी केली? पळवून नेलेल्या वाहनांसाठी तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचाºयांनी सहकार्य केले काय, अशी विचारणा केली आहे. याबाबत स्वत: चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेशही देवरे यांना पत्राद्वारे दिले होते. अपर जिल्हाधिकारी राऊत यांच्या पत्राला तीन दिवसांनी देवरे यांनी उत्तर दिले असून, त्यात म्हटले आहे की, पोलिसांत फिर्याद दाखल करताना जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा केलेला आरोप मला मान्य नाही. तसेच ज्या कलमांचा गुन्ह्यात वापर करायला हवा होता त्या कलमांचा अर्थ वेगळा होत असून, ती कलमे लावणे योग्य ठरणार नाही. आत्तापर्यंत कार्यालयातून घेतलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गाड्या पळवून नेण्याच्या घटनेत कोणी अधिकारी, कर्मचाºयाने मदत केल्याचे निष्पन्न झालेले नाही.असे नमूद करून आपल्या खात्यातील कर्मचारी, अधिकाºयांना क्लिन चीट देऊन टाकली आहे. कोणी मदत केल्याची अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळविण्यात येईल, असेही देवरे यांनी राऊत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एकूणच वाळूमाफियांनी तहसील कार्यालयाच्या आवाराचे कुलूप तोडून दहा गाड्या पळवून नेल्याच्या विषयावरून महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात असून, त्यात पत्रापत्रीचा खेळ रंगल्याने कर्मचाºयांचे मनोरंजन होत आहे.घटनेला पहारेकरी जबाबदार?तहसीलदार ज्योती देवरे यांना अपर जिल्हाधिकाºयांनी वाळूगाड्या पळवून नेल्याप्रकरणी जाब विचारल्यामुळे की काय देवरे यांनी आपल्या पत्रात मालेगाव तहसीलदार कार्यालयातील पहारेकरी हे पद रिक्त असल्याबाबतची जाणीव राऊत यांना करून दिली आहे. पहारेकरी हे पद रिक्त असून, ते भरण्याबाबत आपण तत्काळ कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात असे गैरप्रकार घडणार नाहीत, असेही पत्रात नमूद करून ही सारी घटना पहारेकºयाचे पद रिक्त असल्यामुळेच घडल्याचे अप्रत्यक्ष सूचित केले आहे.