शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

रस्त्यांसह सूचना फलकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:23 IST

निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देनिफाड : दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

निफाड : तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.या भागातील रस्त्यांसह रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या विविध सूचना फलकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. जेथे वळण रस्ता आहे, त्या रस्त्याची माहिती देणाºया दिशादर्शक फलकानेसुद्धा रस्त्याप्रमाणे वळण घेतलेले आहे. ‘पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा’ अशाप्रकारे वाहनचालकांला पुढील अपघाती वळणाची माहिती देणारे फलक पूर्णत: वाकून गेल्याने दिसून येत नाहीत. फलकाकडे बघून असे वाटते की हा फलक आपल्याला सुचवित आहे की पुढे येणाºया रस्त्याची अवस्था ही माझ्यासारखीच वळणाकृती झालेली असून वाहने सावकाश चालवा. तसेच ‘डू नॉट ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ अशी माहिती देणारे फलक तर उलटेच झालेले आहेत, जणूकाही बोर्ड दारू पिऊन उलटा झालेला आहे. नाशिक-औरंगाबाद हायवेच्या बाजूला लावण्यात आलेल्या फलकांची अवस्था अशीच आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गा वरील नैताळे येथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलक तेथील बांबू व्यावसायिकांनी फलकाच्या बाजूला बांबूंची थप्पी लावून पूर्णता झाकवलेला आहे. फलकाच्या बाजूने लावलेल्या बांबूच्या थप्पीमुळे तेथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलकाचा फक्त १० टक्के भाग उघडा आहे. बºयाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि रस्ता दुभाजक यांवरील सूचना फलकच गायब झालेले असून, फक्त फलकांसाठी लावण्यात आलेले खांब उभे आहेत. अपघाताची माहिती देणारे बोर्ड काढून नेले आहेत.ग्रामीण भागातील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेले दिशादर्शक फलक आणि गावाचे नाव, गावाचे अंतर दर्शविणाºया फलकांवर सध्या जाहिरातींनी अतिक्रमण केले आहे. परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि फलकांची मरणासन्न अवस्था याबाबत सा.बां. विभागास कळवूनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.- विजय गिते, मा. उपसरपंच, खेडलेझुंगेरस्त्याच्या कडेला शेतमाल आणि फळफळावळ विक्र ी करणाºया शेतकरी, व्यापारी वर्गाला रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे अडचण निर्माण होते. सुरक्षित जागा मिळण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.- सदाभाऊ कोटकर, सामाजिक कार्यकर्ता, नैताळे

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागGovernmentसरकार