शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

रस्त्यांसह सूचना फलकांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:23 IST

निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देनिफाड : दुरुस्ती केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

निफाड : तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत आहे.या भागातील रस्त्यांसह रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या विविध सूचना फलकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. जेथे वळण रस्ता आहे, त्या रस्त्याची माहिती देणाºया दिशादर्शक फलकानेसुद्धा रस्त्याप्रमाणे वळण घेतलेले आहे. ‘पुढे अपघाती वळण आहे, वाहने सावकाश चालवा’ अशाप्रकारे वाहनचालकांला पुढील अपघाती वळणाची माहिती देणारे फलक पूर्णत: वाकून गेल्याने दिसून येत नाहीत. फलकाकडे बघून असे वाटते की हा फलक आपल्याला सुचवित आहे की पुढे येणाºया रस्त्याची अवस्था ही माझ्यासारखीच वळणाकृती झालेली असून वाहने सावकाश चालवा. तसेच ‘डू नॉट ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह’ अशी माहिती देणारे फलक तर उलटेच झालेले आहेत, जणूकाही बोर्ड दारू पिऊन उलटा झालेला आहे. नाशिक-औरंगाबाद हायवेच्या बाजूला लावण्यात आलेल्या फलकांची अवस्था अशीच आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गा वरील नैताळे येथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलक तेथील बांबू व्यावसायिकांनी फलकाच्या बाजूला बांबूंची थप्पी लावून पूर्णता झाकवलेला आहे. फलकाच्या बाजूने लावलेल्या बांबूच्या थप्पीमुळे तेथील अपघाती वळणाची माहिती देणारा फलकाचा फक्त १० टक्के भाग उघडा आहे. बºयाच ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि रस्ता दुभाजक यांवरील सूचना फलकच गायब झालेले असून, फक्त फलकांसाठी लावण्यात आलेले खांब उभे आहेत. अपघाताची माहिती देणारे बोर्ड काढून नेले आहेत.ग्रामीण भागातील रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आलेले दिशादर्शक फलक आणि गावाचे नाव, गावाचे अंतर दर्शविणाºया फलकांवर सध्या जाहिरातींनी अतिक्रमण केले आहे. परिसरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि फलकांची मरणासन्न अवस्था याबाबत सा.बां. विभागास कळवूनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.- विजय गिते, मा. उपसरपंच, खेडलेझुंगेरस्त्याच्या कडेला शेतमाल आणि फळफळावळ विक्र ी करणाºया शेतकरी, व्यापारी वर्गाला रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे अडचण निर्माण होते. सुरक्षित जागा मिळण्यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे.- सदाभाऊ कोटकर, सामाजिक कार्यकर्ता, नैताळे

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागGovernmentसरकार