शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

नगरसेविका पतीचा बिटको कोविड रुग्णलयात धुडगुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:15 IST

अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर, कर्मचारी , रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड ...

अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर, कर्मचारी , रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरून गेले होते अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे सुरुवातीला कुणालाच काही समजत नव्हते. आवाजामुळे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील रुग्ण व त्यांचे नातेवाईक गॅलरीत आले होते. काचेचे प्रवेशव्दार फुटल्याने रुग्णालय आवारात सर्वत्र काचांचा खच पडला होता. सदर घटना नाशिकरोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बिटको रुग्णालयाला पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला असला तरी ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी केवळ तीन सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारावर हजर होते.

सदर घटनेची माहिती मिळताच महापौर सतीश कुलकर्णी, पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी भेट देऊन पाहणी केली . रुग्णालयाच्याा आत मध्ये सर्वत्र काचेचा थर पडलाा असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे बंद करून दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार येण्या-जाण्यासाठी सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नव्हती.

चौकट-

रुग्ण रुग्णालय सोडून गेले

अचानक घडलेल्या घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक भीतीपोटी रुग्णालय सोडून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

चौकट-

बिटको कोरोना सेंटरमध्ये काही दिवसापूर्वीच राजेंद्र ताजणे यांचे वडील उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले तेव्हा ताजणे यांना वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडर खाजगी आणावे लागले होते. कोरोना बिटको सेंटरमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता तिप्पट-चौपट रुग्ण दाखल होते सर्वसामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक अक्षरशा हतबल झाले होते त्यातून या दुर्दैवी घटनेचा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे .

कोट-

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मित्र परिवार, प्रभागातील नागरिक, नातेवाईक, सहकारी कार्यकर्ते असे ७८ जण दगावले. बिटको रुग्णालयातील काळाबाजार , उडवाउडवीची उत्तरे हे दररोजचे झाले होते. माझे स्वत:चे वडील यांना ऑक्सिजन लावल्यावर तो सुरु कसा करायचा हे देखील कर्मचाऱ्यांना माहीत नसल्याने त्य क्षेत्रातील खासगी मित्रपरिवाराला बोलावून वडिलांचे ऑक्सिजन चालू केले. माझे वडील ॲडमिट असताना फक्त सुविधेचा अभाव व अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. माझ्या समोर अनेक सर्वसामान्य गोरगरिबांचे बळी गेले त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी व शासनाला समजण्यसाठी मी हे कृत्य केले. - राजेंद्र ऊर्फ कन्नु काशिनाथ ताजणे , संस्थापक मित्रमेळा