शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नगरसेविका पतीचा बिटको कोविड रुग्णलयात धुडगुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:15 IST

अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर, कर्मचारी , रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड ...

अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर, कर्मचारी , रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरून गेले होते अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे सुरुवातीला कुणालाच काही समजत नव्हते. आवाजामुळे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील रुग्ण व त्यांचे नातेवाईक गॅलरीत आले होते. काचेचे प्रवेशव्दार फुटल्याने रुग्णालय आवारात सर्वत्र काचांचा खच पडला होता. सदर घटना नाशिकरोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

बिटको रुग्णालयाला पोलिस बंदोबस्त देण्यात आलेला असला तरी ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी केवळ तीन सुरक्षा रक्षक प्रवेशद्वारावर हजर होते.

सदर घटनेची माहिती मिळताच महापौर सतीश कुलकर्णी, पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी भेट देऊन पाहणी केली . रुग्णालयाच्याा आत मध्ये सर्वत्र काचेचा थर पडलाा असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे बंद करून दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार येण्या-जाण्यासाठी सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नव्हती.

चौकट-

रुग्ण रुग्णालय सोडून गेले

अचानक घडलेल्या घटनेमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने काही रुग्ण व त्यांचे नातेवाईक भीतीपोटी रुग्णालय सोडून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

चौकट-

बिटको कोरोना सेंटरमध्ये काही दिवसापूर्वीच राजेंद्र ताजणे यांचे वडील उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले तेव्हा ताजणे यांना वडिलांसाठी ऑक्सिजन सिलेंडर खाजगी आणावे लागले होते. कोरोना बिटको सेंटरमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता तिप्पट-चौपट रुग्ण दाखल होते सर्वसामान्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक अक्षरशा हतबल झाले होते त्यातून या दुर्दैवी घटनेचा उद्रेक झाल्याचे बोलले जात आहे .

कोट-

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून मित्र परिवार, प्रभागातील नागरिक, नातेवाईक, सहकारी कार्यकर्ते असे ७८ जण दगावले. बिटको रुग्णालयातील काळाबाजार , उडवाउडवीची उत्तरे हे दररोजचे झाले होते. माझे स्वत:चे वडील यांना ऑक्सिजन लावल्यावर तो सुरु कसा करायचा हे देखील कर्मचाऱ्यांना माहीत नसल्याने त्य क्षेत्रातील खासगी मित्रपरिवाराला बोलावून वडिलांचे ऑक्सिजन चालू केले. माझे वडील ॲडमिट असताना फक्त सुविधेचा अभाव व अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे माझ्या सहनशीलतेचा अंत झाला. माझ्या समोर अनेक सर्वसामान्य गोरगरिबांचे बळी गेले त्यामुळे प्रशासनाला जाग येण्यासाठी व शासनाला समजण्यसाठी मी हे कृत्य केले. - राजेंद्र ऊर्फ कन्नु काशिनाथ ताजणे , संस्थापक मित्रमेळा