शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

स्वयंशिस्तीनेच होईल कोरोनाचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील ...

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील गर्दी ही धोक्याची वर्दी मानली जात असल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागू करणे जिल्हा प्रशासनाला भाग पडले असले तरी आता यापुढे लॉकडाऊनची वेळ येऊ द्यायची नसेल तर सर्वानीच स्वयंशिस्तीने आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशा भावना नाशिकमधील मान्यवर व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

नाशिकमध्ये बाधितांची संख्या वाढू लागल्याने सोमवार ते शुक्रवार दुकाने आणि बाजारपेठा सायंकाळी ७ वाजपेर्यंत सुरू ठेवण्याची मर्यादा असून शनिवार - रविवारी तर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा व्यापाऱ्यांच्या आणि बाजारपेठेतील अर्थकारणाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील फटका बसणार आहे. त्यामुळे कोरोना वाढू न देणे यासाठी सर्व प्रथमच सर्वांनीच शिस्त बाळगली पाहिजे, बाजारपेठा सुरू असल्यावरही स्वयंशिस्त पाळली पाहिजे तरच कोरोनाचा पराभव होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कोट-१

प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लादावे, दुकाने ही गर्दीची ठिकाणे नाही. दुकानांमध्ये गर्दी होत नाही. आणि आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक खबरदारीही घेतली जाते. दोन दिवसाच्या बंदला व्यावसायिकांनी सहकार्य केले. परंतु, गेल्या वर्षभराच्या कठीण परिस्थितीनंतर व्यवसाय रुळावर येत असताना यापुढे बंद हा पर्याय होऊ शकत नाही.

- गिरिश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन नाशिक

कोट- २

बाजारपेठेत शनिवारी, रविवारी दुकाने बंद राहिली तर महिन्याचा २५ टक्के व्यवसाय बंद राहणार आहे. अशाप्रकारे व्यवसायाच्याच दिवशी दुकाने बंद राहिली तर व्यावसायिकांना नोकरकपात अथवा वेतनकपात करावी लागली तर त्याचा अर्थचक्रावरही गंभीर परिणाम होईल.

-दिग्विजय कापडिया, अध्यक्ष, कापड विक्रेता महासंघ.

कोट- ३

निर्बंधात दुग्ध व्यवसायाला सवलत असली तरी बाजारपेेठेत बाहेरून येणारा ग्राहकच नसल्याने व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अर्थात, अशी निर्बंधाची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर सर्वांनीच आरोग्य नियमांचे पालन केले पाहिजे.

-किशोर कासलीवाल, डेअरी व्यावसायिक

कोट- ४

शेतमाल व भाजीपाला विक्रीचा व्यावसाय सुरू असला तरी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळच नाही, त्यामुळे ५० टक्केही व्यावसाय होत नसल्याने भांडवलही सुटत नाही. त्यामुळे वेळेचे निर्बंध कायम ठेवून बाजारपेठ सुरूच ठेवणे आवश्यक आहे.

- वैभव जाधव, भाजी विक्रेता

कोट-५

प्रवासी बस स्थानके व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी फारच कमी असते. ग्राहकच नसल्याने आधीच संकटाचा सामना करीत असलेल्या किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवले तर आणखीनच अडचणीत येतील.

-रामेश्वर जाजू, अध्यक्ष, रिटेल क्लॉथ असोसिएशन, नाशिकरोड विभाग.