शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

स्वयंशिस्तीनेच होईल कोरोनाचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील ...

नाशिक : कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा निर्बंधांना सामोरे जावे लागत असून व्यापारी आणि व्यवसायिकांना त्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील गर्दी ही धोक्याची वर्दी मानली जात असल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागू करणे जिल्हा प्रशासनाला भाग पडले असले तरी आता यापुढे लॉकडाऊनची वेळ येऊ द्यायची नसेल तर सर्वानीच स्वयंशिस्तीने आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अशा भावना नाशिकमधील मान्यवर व्यापारी प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

नाशिकमध्ये बाधितांची संख्या वाढू लागल्याने सोमवार ते शुक्रवार दुकाने आणि बाजारपेठा सायंकाळी ७ वाजपेर्यंत सुरू ठेवण्याची मर्यादा असून शनिवार - रविवारी तर सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचा व्यापाऱ्यांच्या आणि बाजारपेठेतील अर्थकारणाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील फटका बसणार आहे. त्यामुळे कोरोना वाढू न देणे यासाठी सर्व प्रथमच सर्वांनीच शिस्त बाळगली पाहिजे, बाजारपेठा सुरू असल्यावरही स्वयंशिस्त पाळली पाहिजे तरच कोरोनाचा पराभव होईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

कोट-१

प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लादावे, दुकाने ही गर्दीची ठिकाणे नाही. दुकानांमध्ये गर्दी होत नाही. आणि आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक खबरदारीही घेतली जाते. दोन दिवसाच्या बंदला व्यावसायिकांनी सहकार्य केले. परंतु, गेल्या वर्षभराच्या कठीण परिस्थितीनंतर व्यवसाय रुळावर येत असताना यापुढे बंद हा पर्याय होऊ शकत नाही.

- गिरिश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन नाशिक

कोट- २

बाजारपेठेत शनिवारी, रविवारी दुकाने बंद राहिली तर महिन्याचा २५ टक्के व्यवसाय बंद राहणार आहे. अशाप्रकारे व्यवसायाच्याच दिवशी दुकाने बंद राहिली तर व्यावसायिकांना नोकरकपात अथवा वेतनकपात करावी लागली तर त्याचा अर्थचक्रावरही गंभीर परिणाम होईल.

-दिग्विजय कापडिया, अध्यक्ष, कापड विक्रेता महासंघ.

कोट- ३

निर्बंधात दुग्ध व्यवसायाला सवलत असली तरी बाजारपेेठेत बाहेरून येणारा ग्राहकच नसल्याने व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अर्थात, अशी निर्बंधाची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर सर्वांनीच आरोग्य नियमांचे पालन केले पाहिजे.

-किशोर कासलीवाल, डेअरी व्यावसायिक

कोट- ४

शेतमाल व भाजीपाला विक्रीचा व्यावसाय सुरू असला तरी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळच नाही, त्यामुळे ५० टक्केही व्यावसाय होत नसल्याने भांडवलही सुटत नाही. त्यामुळे वेळेचे निर्बंध कायम ठेवून बाजारपेठ सुरूच ठेवणे आवश्यक आहे.

- वैभव जाधव, भाजी विक्रेता

कोट-५

प्रवासी बस स्थानके व अन्य सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी फारच कमी असते. ग्राहकच नसल्याने आधीच संकटाचा सामना करीत असलेल्या किरकोळ विक्रेते दुकाने बंद ठेवले तर आणखीनच अडचणीत येतील.

-रामेश्वर जाजू, अध्यक्ष, रिटेल क्लॉथ असोसिएशन, नाशिकरोड विभाग.