शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निफाड तालुक्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:18 IST

ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण जास्त असून, मृत्यूचे प्रमाण ३.१७ टक्क्याच्या जवळपास आहे. घटत्या रुग्णसंख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदिलासा : मृत्युदर मात्र ३.१७ टक्के

ओझर : जिल्ह्यासह राज्यात कोरोना रुग्णांचे दररोज वाढणारे आकडे धडकी भरणारे आहेत. त्यातच मृत्यूचे तांडव सुरू आहे. हे वास्तव असले तरी अन्य आजार व घाबरणे हेसुद्धा कोरोनात मृत्यूचे आणखी एक कारण असल्याचे समोर येत आहे. निफाड तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण जास्त असून, मृत्यूचे प्रमाण ३.१७ टक्क्याच्या जवळपास आहे. घटत्या रुग्णसंख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट कायम आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात शासन व प्रशासनाला यश मिळाले. सध्या कोरोना अधिक वेगाने पसरत आहे. दररोज कोरोना रुग्णांचे व मृत्यूचे आकडे भयभीत करणारे आहेत. त्यामुळे मनामनात भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे.कोरोनाचे संकट अगदी जवळ आले असले तरी सजगता व निर्बंधांचे पालन केल्यास हे संकट अनेकपटींनी कमी करता येऊ शकते. सध्याच्या लाटेत कोरोना झालेले ८७.२ टक्के रुग्ण ठणठणीत होत आहेत.७ मे २०२१ पर्यंत तालुक्यातील १६ हजार २३२ नागरिकांना कोरोना झाला. त्यापैकी १४ हजार १५४ नागरिक कोरोनाला हरवून आले आहे. १ हजार ५६४ जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण ५१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.पहिल्या लाटेच्या तुलनेत या लाटेत संकटाची व्याप्ती वाढली आहे. नागरिकांनी अजूनही सजगता व निर्बंधांचे काटेकोर पालन केल्यास कोरोनाच्या या लाटेवरही मात होऊ शकते. वेळीच तपासणी व योग्य उपचार मिळाल्यास ज्येष्ठांनी कोरोनावर मात केल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची चिंता करण्याऐवजी स्वतः व परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे.नागरिकांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूंत्रीचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करावी. पात्र, नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. निफाड तालुक्यातील ८७.२ टक्के नागरिकांनी कोविडवर यशस्वी मात केली आहे. नागरिकांनी शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करावे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.- डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, निफाड.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याgram panchayatग्राम पंचायत