शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कोरोना बळींनी ओलांडली चाळिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST

नाशिक : काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर ...

नाशिक : काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यात ४,४३५ रुग्ण बाधित झाले असून ४,५९६ रुग्ण बरे झाले आहेत.

एकाच दिवसात एकूण ४१ बळी गेले असून, त्यात सर्वाधिक २६ बळी नाशिक ग्रामीण क्षेत्रामधील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,८५७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,४०३ तर नाशिक ग्रामीणला १,८३२ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १५० व जिल्हाबाह्य ५० रुग्ण बाधित आहेत. तसेच जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २६, मालेगाव मनपा क्षेत्रात ४, जिल्हाबाह्य २ असा एकूण ४१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. गत आठवड्यात मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर सामान्य नागरिकांकडून व्यक्त होऊ लागला आहे.

इन्फो

ग्रामीणमध्ये प्रथमच तिप्पट बळी

कोरोनाच्या पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यातदेखील जिल्ह्यात बळींमध्ये नाशिक शहराची आघाडी होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून काही दिवस नाशिक शहर तर काही दिवस नाशिक ग्रामीण बळींमध्ये पुढे जात असल्याचे दिसून येत होते. मात्र शुक्रवारी नाशिक शहराच्या तुलनेत सुमारे तिप्पट बळी नाशिक ग्रामीणला गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाची दहशत अधिक वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

प्रलंबित अहवाल ७ हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या वाढलेली होती. गत दोन दिवसांत प्रलंबित अहवालांनी १० हजारांचा आकडा ओलांडला होता. मात्र, त्यात गुरुवारी अधिक प्रमाणात प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या ७,६४७ वर आली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ४१६२, नाशिक मनपा क्षेत्रातील २९०९ तर मालेगाव मनपाचे ५७६ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या अद्याप वाढलेलीच असल्याने पुढचे चार दिवस बाधितांच्या प्रमाणात वाढ राहण्याची शक्यता आहे.