शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची मुसंडी; पण लसीकरण कासवगतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:15 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची गती अत्यंत धिमी असल्याने एक तृतीयांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासदेखील वर्षभराहून अधिक कालावधी लागण्याची ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची गती अत्यंत धिमी असल्याने एक तृतीयांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासदेखील वर्षभराहून अधिक कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. एकीकडे कोरोना भयावह वेगाने मुसंडी मारत असताना लसीकरणाची कासवगती ही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत क्लेशदायक ठरत आहे.

राज्याकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस नाहीत ही वस्तुस्थिती सातत्याने उघड होत आहे. त्यामुळेच कधी ज्येष्ठांना लस, कधी केवळ युवांना लस तर कधी लसीकरण ठप्प अशा प्रकारे लसीकरणाचे कामकाज संथ गतीने सुरू आहे. त्याच वेगाने कोरोना लसीकरण सुरू राहिले, तर आपल्याला लस कधी मिळणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना लसीकरण धिम्या गतीने केल्यास पुन्हा एकदा लसीकरण मोहीम राबवावी लागेल का, कोरोना व्हायरसने गुणधर्म बदलल्यास लसीमध्ये बदल करावे लागतील का, त्याच गतीने लसीकरण सुरू राहिल्यास तुम्हा-आम्हाला लस मिळायला किती वर्षे लागतील, हे कुणीही सांगू शकत नाही. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत असताना कोरोनावर लस कधी येणार, असा प्रश्न लोक उपस्थित करत होते. राज्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत. त्यामुळे आपल्या राज्यात लसीकरणाचा वेग कमी आहे का, राज्यात कोरोना रुग्ण वाढीची काय कारणे आहेत, जर लसीकरणाचा वेग अधिक असेल तर कोरोनाचे आकडे वाढण्याची कारणे काय, कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये मोठा फरक पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या लाटेमध्ये आपल्याकडे लस नव्हती. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे कोरोनाची लस आहे. दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याकडे कोरोनाची लस असतानाही राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्य शासनाच्या माहितीनुसार १२ कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के नागरिकांच्या दोन्ही लस घेऊन झाल्या आहेत. राज्याने केंद्र सरकारकडे दर आठवड्याला २० लाख कोरोना लसीची मागणी केली.

इन्फो

सर्व टप्पे कधी पूर्ण होणार?

महाराष्ट्राने दररोज ३ लाख लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रारंभी कोविड योद्ध्यांना राज्यात लस देण्याचे ठरले, तर दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील तसेच ज्या लोकांना गंभीर आजार आहेत अशा ४५ वर्षावरील लोकांना लस दिली देण्यात आली. तर १ मेपासून १८ वर्षावरील सर्व सज्ञान नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस देण्यास प्रारंभ करूनही त्यांचेदेखील सर्वांचे दोन्ही डोस अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यात अजून १८ वर्षाखालील युवा आणि बालकांना लसी कधी मिळणार, ते समजू शकलेले नाही.

इन्फो

कालावधीबाबत अनिश्चितता

१२ कोटी जनतेपैकी दररोज ३ लाख लोकांना कोरोनाची लस दिली जाते. असे गृहीत धरले तरी सध्याच्या वेगाने साधारणपणे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, सरकार सरसकट लसीकरण करत नसल्याने पहिला टप्पा जाहीर झाल्यानंतर दुसरा टप्पा, दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा असे लसीकरणाचे टप्पे केले जात आहे. आणि ठरावीक वयातील लोकांना आजार पाहून लसीकरण केले जात आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाच्या पूर्णत्वाला दशकातील मध्यापर्यंतची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इन्फो

खासगीतील लसीकरण ठप्पचाही परिणाम

त्यात लसी प्राप्त होण्याचे प्रमाणच कमी असल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयातून मिळू शकणाऱ्या लसीदेखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये होणारी लसीकरणाची प्रक्रियादेखील ठप्प झाली आहे. भविष्यात जेव्हा मुबलक लस उपलब्ध होतील, तेव्हाच आता खासगीमध्ये लसीकरणाला प्रारंभ होणार असून त्यानंतरच खऱ्या अर्थाने लसीकरण वेग पकडू शकणार आहे.

------------------

(डमी)