शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पारावरच्या गप्पांना कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:24 IST

जळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे पारावरच्या गप्पा पूर्णपणे बंद पडल्या असून, सर्वत्रच पार ओस पडलेले दिसत आहेत.

ठळक मुद्देजळगाव निंबायती : ग्रामीण भागात नागरिकांकडूनच सतर्कता

अमोल अहिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव निंबायती : गावातील अथवा शहरातील मुख्य चौकात झाडाखाली, तसेच मंदिरांच्या बाहेर पारावर बसून गप्पागोष्टी करण्याची एक आगळीवेगळी संस्कृती खेड्यागावात पहावयास मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे, गर्दी टाळून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे पारावरच्या गप्पा पूर्णपणे बंद पडल्या असून, सर्वत्रच पार ओस पडलेले दिसत आहेत.पार म्हणजे काय हे आता नव्याने सांगायला नको. मात्र युवा पिढीला विशेषत: शहरी भागातील तरुणाईला आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात देशातील बहुधा सर्वच भागात पूर्वापारपासून प्रचलित असलेली ही ह्यपारह्ण संस्कृतीची माहिती अथवा अनुभव फारसा नसावा. मात्र अनेक गावं तसेच शहरामध्ये असलेले पार, ओटा आजही अनेक ऐतिहासिक घटनांचे प्रत्यक्ष मूक साक्षीदार आहेत. प्रत्येक गावात जुन्या पिंपळाच्या, कडुलिंबाच्या किंवा वडाच्या झाडाभोवती जो मोठा ओटा असतो तो म्हणजेच गप्पांचा एक कट्टा किंवा अड्डा. अनेक गावात झाडाभोवती असे पार बनवलेले आहेत. विसावा घेण्यासाठी तसेच गप्पांसाठी त्यांचा उपयोग होतो. ज्या पारावर घरातल्या राजकारणापासून ते थेट देशातल्या राजकारणापर्यंत थोडक्यात गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंतच्या गप्पा रंगतात तो कट्टा म्हणजे पार. या गप्पा अगदी अघळपघळ असतात.पूर्वी याच पारावर गावाचा न्यायनिवाडादेखील होत असे. अनेकांना या पारावरून न्याय मिळाल्याची अनेक उदाहरणे देता येतील. पारावर बसूनच पूर्वीच्या काळी गावातील आपापसातील तंटे सरपंच व पंचमंडळी सामोपचाराने मिटवत होते. पारावरच चावडी भरायची. पूर्वी छोट्या खेडेगावामध्ये पारावरच गावातील शाळाही भरत असे. स्वातंत्र्यपूर्व काळातदेखील या पारांना मोठे महत्त्व होते. अनेक महत्त्वपूर्ण घटना या पारावर बसूनच ठरत असायच्या. कधीकाळी हे पार सभेचे व्यासपीठ झालेले आपणास पहावयास मिळते. गावातल्या पोरांनी अनेक दिग्गजांची भाषणे या पाराभोवती बसून ऐकले आहेत. जसे गावात पार आहेत. त्याप्रमाणे शहरातदेखील या पारांना मोठा इतिहास आहे. शहरातील जुन्या भागामध्ये आजही अनेक पार इतिहासाची साक्ष देत तिथे टिकून आहेत. नाशकातील भद्रकाली परिसरातील ह्यपिंपळपारह्ण हे त्याचे उदाहरण आहे.पूर्वीच्या काळी घरात टीव्ही नव्हते. त्यामुळे जेवणाच्या वेळेपर्यंत लोक पारावर बसून मनसोक्त गप्पा मारत असत. आज घरोघरी टीव्ही आल्यामुळे, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाइल आल्यामुळे पारावरच्या गप्पा फारच कमी झाल्या असल्या तरी, पूर्णपणे मात्र बंद झालेल्या नाहीत. कोणीतरी एखादा दुपारच्या वेळी पाराच्या कडेवर पाय सोडून निवांत बसलेला आपल्याला हमखास दिसायचा, मात्र कोरोना संसर्गाच्या भीतीने पार पूर्णपणे निर्मनुष्य झाले आहेत.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाgram panchayatग्राम पंचायत