शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

कोरोनाचा बाजा अन् पथकांचा वाजला बॅण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:35 IST

चंद्रमणी पटाईत । नाशिक : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ...

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल ठप्प : बॅण्डमालक, कलाकारांवर उपासमारीची वेळ

चंद्रमणी पटाईत ।नाशिक : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे व महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. तर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सर्वच सोहळे रद्द करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यातच यंदाचा लग्नसराईचा हंगाम संपत आल्याने बॅण्ड पथकाच्या चालक-मालकांसह कलाकारांवर व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत बॅण्ड व्यावसायिक सापडले आहेत.कोरोनामुळे लोकांचे आयुष्य थंडावलं आहे. एका क्षणात हा वेग जणू शून्यावर आला आहे. कोणाला हा वेळ खायला उठलाय, तर या रिकामपणाचं काय करायचं असा प्रश्न काहींना पडलाय. अनेकांवर रोजगाराआभावी भूकबळीची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक बॅण्ड पथकांचा उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसराईमुळे सुकाळ असतो. चार महिन्यात वर्षभर पुरेल एवढी पुंजी ते जमा करतात, मात्र यंदा कोरोनाने अचानक आक्रमण केले आणि सुखाचा घास हिरावून नेल्याची भावना कलाकारांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे बॅण्ड व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.सध्या कोरोनामुळे सर्वच सोहळे रद्द झाल्याने मंगलवाद्यांवरही बंदी आली आहे. यामुळे केवळ वादकांवर उपासमारीची वेळ आहे. त्याचप्रमाणे १४ एप्रिलनिमित्त डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महिनाभर मिरवणुका निघतात. त्यात बॅण्ड पथकांना मोठी मागणी असते; परंतु जयंती, उत्सव रद्द केल्याने वादकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जनजागृती मोहिमेत सहभाग द्यावाकोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, गैरसमज दूर व्हावेत, विविध उपाययोजनांबद्दल चर्चा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांसह ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. शासनाकडून विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत शासनाने जर बॅण्ड पथकांना सामावून घेतले आणि कलावंतांना मानधन दिले तर त्यांना नक्कीच जगण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी आधार मिळू शकेल, अशी भावना पथकांच्या संचालकांकडून व्यक्त होत आहे.लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने कलाकारांकडे लक्ष द्यावे. लॉकडाउन लवकर उठल्यास आम्हाला कार्यक्रम मिळतील. रोजीरोटी मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी. बॅण्ड पथकही सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून मंगलकार्य पार पाडतील. लॉकडाउनमधून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे, त्यात बॅण्डचाही समावेश व्हावा. - शेख मास्टरझंकार ब्रासबॅण्ड, साकोराआम्ही कारागिरांना वर्षभराचे पेमेंट आगाऊ केलेले असते. मात्र हा सीझन पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे आमच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातही ज्या कारागिरांना मदत हवी असते त्यांना आम्ही फुल नाही फुलाच्या पाकळीची मदत करत आहोत. लॉकडाउन सुरू असेपर्यंत आम्ही आमच्या परीने मदत करत राहू. अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लवकरच कोरोनाचे संकट दूर जाईल अशी अपेक्षा आहे.- दिलीप सोनवणे, संचालक, स्वरसम्राट ब्रास बॅण्ड, सटाणाआमच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हालाच सुपारी (आॅर्डर) मिळत नसल्याने काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमचा बॅण्ड लॉन्सला जोडलेला आहे; परंतु सध्या लॉन्स बंद असल्याने लॉकडाउन कधी संपेल याची प्रतीक्षा आहे. कारागिरांना द्यावा लागणारा अ‍ॅडव्हान्स घरातील दागिने गहाण ठेवून दिला आहे.- विनोद सोनवणेश्री स्वामी समर्थ ब्रासबॅण्ड, नाशिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcultureसांस्कृतिक