शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

कोरोनाचा बाजा अन् पथकांचा वाजला बॅण्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:35 IST

चंद्रमणी पटाईत । नाशिक : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने ...

ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढाल ठप्प : बॅण्डमालक, कलाकारांवर उपासमारीची वेळ

चंद्रमणी पटाईत ।नाशिक : कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने गर्दीच्या ठिकाणी जाणे व महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे. तर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार सर्वच सोहळे रद्द करण्यात आले आहेत. परिणामी छोटे-मोठे व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यातच यंदाचा लग्नसराईचा हंगाम संपत आल्याने बॅण्ड पथकाच्या चालक-मालकांसह कलाकारांवर व कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कोरोना कधी हद्दपार होणार आणि पुन्हा ‘अच्छे दिन’ कधी येणार या विवंचनेत बॅण्ड व्यावसायिक सापडले आहेत.कोरोनामुळे लोकांचे आयुष्य थंडावलं आहे. एका क्षणात हा वेग जणू शून्यावर आला आहे. कोणाला हा वेळ खायला उठलाय, तर या रिकामपणाचं काय करायचं असा प्रश्न काहींना पडलाय. अनेकांवर रोजगाराआभावी भूकबळीची वेळ येऊन ठेपली आहे. अनेक बॅण्ड पथकांचा उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसराईमुळे सुकाळ असतो. चार महिन्यात वर्षभर पुरेल एवढी पुंजी ते जमा करतात, मात्र यंदा कोरोनाने अचानक आक्रमण केले आणि सुखाचा घास हिरावून नेल्याची भावना कलाकारांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे बॅण्ड व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.सध्या कोरोनामुळे सर्वच सोहळे रद्द झाल्याने मंगलवाद्यांवरही बंदी आली आहे. यामुळे केवळ वादकांवर उपासमारीची वेळ आहे. त्याचप्रमाणे १४ एप्रिलनिमित्त डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महिनाभर मिरवणुका निघतात. त्यात बॅण्ड पथकांना मोठी मागणी असते; परंतु जयंती, उत्सव रद्द केल्याने वादकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जनजागृती मोहिमेत सहभाग द्यावाकोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा, गैरसमज दूर व्हावेत, विविध उपाययोजनांबद्दल चर्चा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांसह ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. शासनाकडून विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. या मोहिमेत शासनाने जर बॅण्ड पथकांना सामावून घेतले आणि कलावंतांना मानधन दिले तर त्यांना नक्कीच जगण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी आधार मिळू शकेल, अशी भावना पथकांच्या संचालकांकडून व्यक्त होत आहे.लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने कलाकारांकडे लक्ष द्यावे. लॉकडाउन लवकर उठल्यास आम्हाला कार्यक्रम मिळतील. रोजीरोटी मिळण्यासाठी शासनाने उपाययोजना करावी. बॅण्ड पथकही सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून मंगलकार्य पार पाडतील. लॉकडाउनमधून काही उद्योग-व्यवसायांना सूट दिली आहे, त्यात बॅण्डचाही समावेश व्हावा. - शेख मास्टरझंकार ब्रासबॅण्ड, साकोराआम्ही कारागिरांना वर्षभराचे पेमेंट आगाऊ केलेले असते. मात्र हा सीझन पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे आमच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातही ज्या कारागिरांना मदत हवी असते त्यांना आम्ही फुल नाही फुलाच्या पाकळीची मदत करत आहोत. लॉकडाउन सुरू असेपर्यंत आम्ही आमच्या परीने मदत करत राहू. अनेक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लवकरच कोरोनाचे संकट दूर जाईल अशी अपेक्षा आहे.- दिलीप सोनवणे, संचालक, स्वरसम्राट ब्रास बॅण्ड, सटाणाआमच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्हालाच सुपारी (आॅर्डर) मिळत नसल्याने काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आमचा बॅण्ड लॉन्सला जोडलेला आहे; परंतु सध्या लॉन्स बंद असल्याने लॉकडाउन कधी संपेल याची प्रतीक्षा आहे. कारागिरांना द्यावा लागणारा अ‍ॅडव्हान्स घरातील दागिने गहाण ठेवून दिला आहे.- विनोद सोनवणेश्री स्वामी समर्थ ब्रासबॅण्ड, नाशिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcultureसांस्कृतिक