शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीने घटले कोरोना रुग्ण; मृत्यूदरातही मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST

शासनाने जमावबंदी, संचारबंदीसारख्या उपाययोजना जारी करतानाच शासकीय व खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची संख्या घटवली, त्याच बरोबर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ...

शासनाने जमावबंदी, संचारबंदीसारख्या उपाययोजना जारी करतानाच शासकीय व खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची संख्या घटवली, त्याच बरोबर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पडले. लग्न समारंभ, अंत्यविधीच्या उपस्थितीवर बंधने लादल्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णसंख्या घडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. संचारबंदी जारी झाल्याच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे ३८५० रुग्ण होते. मात्र, पंधरा दिवसांत ही संख्या ३६,९०६ वर आली आहे.

----------

३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग- २,४८,८६८

पॉझिटिव्ह- ३८,५८०

रुग्णालयातून सुटी- २,०७,४७२

कोरोनामुक्तीचा दर- २.०

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर- २२.१

---------------------------

१५ एप्रिल ते १ मे टेस्टिंग- ३,३१,०२७

पॉझिटिव्ह- ३६,९०६

रुग्णालयातून सुटी- २,९०,५६३

कोरोनामुक्तीचा दर- १.२

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर- -२.५

----------------

गर्दीवरील नियंत्रणाने झाले साध्य

१) कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गातून होत असल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने गर्दी होणाऱ्या ठिकाणांना प्रतिबंध तर केलाच; परंतु नागरिकांनाही गर्दी करण्यावर बंधने लादली.

२) संचारबंदी, जमावबंदीमुळे घोळक्याने फिरणारे, बसणाऱ्यांवर निर्बंध लादल्या गेल्याने संसर्गाचा धोका टळण्यास मदत झाली.

३) अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवल्याने तसेच सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद, रिक्षा, टॅक्सीच्या वापरावरही मर्यादा घातल्याने प्रवास टळल्याने कोरोनाचा स्प्रेडर रोखण्यास हातभार लागला.

ग्रामीण भागात रुग्ण वाढण्यास अनेक कारणे

१) नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी अद्यापही बाजार समित्या सुरूच असून, दररोज या ठिकाणी अनेक गावांतून शेतकऱ्यांची ये-जा सुरू असल्याने कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे.

२) लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रियासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे शेकडो लोक एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला.

३) ग्रामीण भागातील आठवडी बाजारातूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. शिवाय मास्कच्या वापराबाबत जनजागृतीचा अभाव कारणीभूत आहे.