शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

संचारबंदीने घटले कोरोना रुग्ण; मृत्यूदरातही मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:23 IST

शासनाने जमावबंदी, संचारबंदीसारख्या उपाययोजना जारी करतानाच शासकीय व खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची संख्या घटवली, त्याच बरोबर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ...

शासनाने जमावबंदी, संचारबंदीसारख्या उपाययोजना जारी करतानाच शासकीय व खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांची संख्या घटवली, त्याच बरोबर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यास भाग पडले. लग्न समारंभ, अंत्यविधीच्या उपस्थितीवर बंधने लादल्यामुळे गर्दीचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत झाली आहे. परिणामी, आरोग्य यंत्रणेवरचा ताण कमी होऊन रुग्णसंख्या घडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होऊ लागले आहे. संचारबंदी जारी झाल्याच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचे ३८५० रुग्ण होते. मात्र, पंधरा दिवसांत ही संख्या ३६,९०६ वर आली आहे.

----------

३१ मार्च ते १४ एप्रिल टेस्टिंग- २,४८,८६८

पॉझिटिव्ह- ३८,५८०

रुग्णालयातून सुटी- २,०७,४७२

कोरोनामुक्तीचा दर- २.०

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर- २२.१

---------------------------

१५ एप्रिल ते १ मे टेस्टिंग- ३,३१,०२७

पॉझिटिव्ह- ३६,९०६

रुग्णालयातून सुटी- २,९०,५६३

कोरोनामुक्तीचा दर- १.२

जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर- -२.५

----------------

गर्दीवरील नियंत्रणाने झाले साध्य

१) कोरोनाचा प्रादुर्भाव संसर्गातून होत असल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने गर्दी होणाऱ्या ठिकाणांना प्रतिबंध तर केलाच; परंतु नागरिकांनाही गर्दी करण्यावर बंधने लादली.

२) संचारबंदी, जमावबंदीमुळे घोळक्याने फिरणारे, बसणाऱ्यांवर निर्बंध लादल्या गेल्याने संसर्गाचा धोका टळण्यास मदत झाली.

३) अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवल्याने तसेच सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद, रिक्षा, टॅक्सीच्या वापरावरही मर्यादा घातल्याने प्रवास टळल्याने कोरोनाचा स्प्रेडर रोखण्यास हातभार लागला.

ग्रामीण भागात रुग्ण वाढण्यास अनेक कारणे

१) नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीसाठी अद्यापही बाजार समित्या सुरूच असून, दररोज या ठिकाणी अनेक गावांतून शेतकऱ्यांची ये-जा सुरू असल्याने कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे.

२) लग्नसमारंभ, अंत्यविधी, दशक्रियासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे शेकडो लोक एकत्र येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला.

३) ग्रामीण भागातील आठवडी बाजारातूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. शिवाय मास्कच्या वापराबाबत जनजागृतीचा अभाव कारणीभूत आहे.