शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोनाची लाट ;अभ्यागतांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

नाशिक: कोरेानाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतरवेळी दररोज ७०० ते ...

नाशिक: कोरेानाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतरवेळी दररोज ७०० ते ८०० अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असतांना गेल्या आठवड्यापासून ही संख्या निम्यावर आली आहे. आता दिवसाला केवळ साडेतीनशे ते चारशेच अभ्यागत कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढत आहे.

जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारेा लोकांची येजा सुरू असते. विविध प्रकारचे परवाने, प्रस्ताव, ना हरकत दाखले, प्रमाणपत्रे तसेच योजना, सुनावणी आदि कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी, प्रांत, रेाजगार हमी, वनहक्क, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, ग्रामपंचायत विभाग, गौण खनिज, रोजगार हमी, संजय गांधी निराधार योजना, मुद्रांक विभाग, विवाह नोंदणी आदि ५२ विभाग आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वर्दळ असते.

प्रत्यक्ष मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर घेतल्या जाणाऱ्या नोंदणीनुसार कार्यालयात दररोज ७०० ते ८०० इतके अभ्यागत कार्यालयात येतात. परंतू गेल्या आठ दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून ही संख्या केवळ ३५० ते ४०० इतकीच झाली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसते.

===Photopath===

170321\17nsk_24_17032021_13.jpg

===Caption===

कलेक्टर ऑफीस