शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

कोरोनाची लाट; अभ्यागतांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतर वेळी दररोज ...

नाशिक : कोरोनाचा प्रभाव वाढू लागल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे दिसत आहे. इतर वेळी दररोज ७०० ते ८०० अभ्यागत जिल्हाधिकारी कार्यालयात येत असताना गेल्या आठवड्यापासून ही संख्या निम्म्यावर आली आहे. आता दिवसाला केवळ साडेतीनशे ते चारशेच अभ्यागत कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाची पायरी चढत आहेत.

जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोकांची ये-जा सुरू असते. विविध प्रकारचे परवाने, प्रस्ताव, नाहरकत दाखले, प्रमाणपत्रे तसेच योजना, सुनावणी आदी कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी, प्रांत,रोजगार हमी, वनहक्क, पुरवठा विभाग, निवडणूक शाखा, ग्रामपंचायत विभाग, गौणखनिज, रोजगार हमी, संजय गांधी निराधार योजना, मुद्रांक विभाग, विवाह नोंदणी आदी ५२ विभाग आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात वर्दळ असते.

प्रत्यक्ष मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर घेतल्या जाणाऱ्या नोंदणीनुसार कार्यालयात दररोज ७०० ते ८०० इतके अभ्यागत येतात. परंतु, गेल्या आठ दिवसांपासून येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून, ही संख्या केवळ ३५० ते ४०० इतकीच झाली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने कार्यालयात येणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसते.