शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नांदगावी व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:14 IST

चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अशांनाच नियमाप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई ...

चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अशांनाच नियमाप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. येवला विभागीय अधिकारी यांनी नांदगाव येथे घेतलेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर केले नाही तर त्यांना व्यवसाय करता येणार नाही. ज्याचे आरटीपीसीआर निगेटिव्ह असेल त्यांनी पत्र सोबत बाळगावे. ॲन्टिजन रॅपिड टेस्ट अहवाल गृहीत धरली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------------------------------------

हिसवळ खुर्दला लसींचा तुटवडा

नांदगाव तालुका : हिसवळ खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडची लस तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपसरपंच संजय आहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे .

हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरणाचा सहा हजारांचा टप्पा पार झाला आहे. या आरोग्य केंद्रात ३८ गावे समाविष्ट असून, सुमारे ६५ हजार लोकसंख्या लसीकरणापासून वंचित आहे. आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सात उपकेंद्रे आहेत. अनेक भागात लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. मात्र शासनाकडून लस उपलब्ध होत नाही. केवळ शंभर-दोनशे लसीचे डोस एकावेळेस उपलब्ध होतात. तेही दोन-दोन, तीन -तीन दिवसाआड. त्यात नांदगाव, मनमाड येथील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन लसीकरण करून घेत आहेत.

दोन्ही शहरांमध्ये लसीकरणाची सुविधा असतानाही नागरिक येथे येतात. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पुरेसी लस उपलब्ध न झाल्यामुळे कर्मचारी वर्गाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पंचक्रोशीतून येणाऱ्या नागरिकांना विनाकारण या ठिकाणी पायपीट करावी लागते.

जून महिन्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांना पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे उर्वरित १५ ते २०दिवस अतिशय महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त लस उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढेल. लसीकरण करून घेणे प्रशासनालाही सोपे जाईल. त्यामुळे त्वरित लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी आहेर यांनी केली आहे .

----------------------------------------------------------

गर्दी नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची

नांदगाव : आरोग्य विभागाकडून आक्षेप, टोलवाटोलवीने गुंतागूंत

नांदगाव : येथील जैन धर्मशाळेत गेल्या शनिवारी (दि.८) लसीकरणासाठी झालेल्या गर्दीमुळे कोविड-१९ च्या नियमांचा पुरता बोजवारा उडाला होता. त्याची जबाबदारी आरोग्य विभागाची नसून स्थानिक प्रशासनाची असल्याचा आक्षेप तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी घेतला असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

शनिवारी तहसीलदार यांनी गर्दीची जबाबदारी झटकत देशात असेच चालले आहे, मी तरी काय करणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कमी पुरवठ्यामुळे आपला नंबर केव्हा लागतो या आशंकेने धास्तावलेले नागरिक सरकारी बाबूंच्या, चेंडू फळीच्या खेळात वाऱ्यावर सोडले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. ससाणे यांनी इतर यंत्रणांनी सहकार्य करावे, अशी भूमिका आता घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोविड-१९ लसीकरण सत्राच्या ठिकाणी होणारी गर्दी हा एक गंभीर रूप धारण करणारा मुद्दा होऊन बसला आहे. लस देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असली तरी लस घेणाऱ्या लाभार्थींच्या गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी स्थानिय प्रशासनाने स्वीकारली तर गर्दीचे नियोजन होऊ शकते. नगर परिषद प्रशासनाने २०० टोकन नंबर वितरित करून तेवढेच लोक लसीकरणाला हजर राहतील याचे नियोजन करावे. कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देऊन गर्दीचे नियोजन करावे. इतर खात्यातील अधिकारी/कर्मचारी वर्गावर याची जबाबदारी द्यावी. पोलीस प्रशासनाची आवश्यक तेथे मदत घ्यावी. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या भागातच आपले लसीकरण करून घ्यावे. ऑनलाइन रजिस्टेशन करूनच लसीकरण सत्रात यावे या व इतर सूचनांचे जनतेने अनुपालन केले तर शांततेत लसीकरण पार पाडण्यात सहकार्य होईल व हे सहकार्य जनतेकडून अपेक्षित आहे, असे डॉ. अशोक ससाणे यांनी स्पष्ट केलेे.

इन्फो

अनेक जण लसविना माघारी

लसीकरणाच्या दिवशी केंद्रात नागरिकांची व रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती. आरोग्य कर्मचारी लस घेऊन तब्बल दीड तास उशिराने दाखल झाले. ते ही लसीचे फक्त ७० डोस घेऊन आले. या प्रकारामुळे नागरिकांना विनालस घरी जावे लागले. या घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.