शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:14 IST

चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अशांनाच नियमाप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई ...

चाचणी अहवाल निगेटिव्ह असेल अशांनाच नियमाप्रमाणे व्यवसाय सुरू ठेवता येणार आहेत. उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. येवला विभागीय अधिकारी यांनी नांदगाव येथे घेतलेल्या बैठकीनंतर आदेश जारी करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर केले नाही तर त्यांना व्यवसाय करता येणार नाही. ज्याचे आरटीपीसीआर निगेटिव्ह असेल त्यांनी पत्र सोबत बाळगावे. ॲन्टिजन रॅपिड टेस्ट अहवाल गृहीत धरली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------------------------------------

हिसवळ खुर्दला लसींचा तुटवडा

नांदगाव तालुका : हिसवळ खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविडची लस तत्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपसरपंच संजय आहेर व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे .

हिसवळ खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरणाचा सहा हजारांचा टप्पा पार झाला आहे. या आरोग्य केंद्रात ३८ गावे समाविष्ट असून, सुमारे ६५ हजार लोकसंख्या लसीकरणापासून वंचित आहे. आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सात उपकेंद्रे आहेत. अनेक भागात लसीकरण करून घेण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. मात्र शासनाकडून लस उपलब्ध होत नाही. केवळ शंभर-दोनशे लसीचे डोस एकावेळेस उपलब्ध होतात. तेही दोन-दोन, तीन -तीन दिवसाआड. त्यात नांदगाव, मनमाड येथील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन लसीकरण करून घेत आहेत.

दोन्ही शहरांमध्ये लसीकरणाची सुविधा असतानाही नागरिक येथे येतात. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पुरेसी लस उपलब्ध न झाल्यामुळे कर्मचारी वर्गाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पंचक्रोशीतून येणाऱ्या नागरिकांना विनाकारण या ठिकाणी पायपीट करावी लागते.

जून महिन्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांना पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे उर्वरित १५ ते २०दिवस अतिशय महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त लस उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढेल. लसीकरण करून घेणे प्रशासनालाही सोपे जाईल. त्यामुळे त्वरित लस उपलब्ध व्हावी, अशी मागणी आहेर यांनी केली आहे .

----------------------------------------------------------

गर्दी नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची

नांदगाव : आरोग्य विभागाकडून आक्षेप, टोलवाटोलवीने गुंतागूंत

नांदगाव : येथील जैन धर्मशाळेत गेल्या शनिवारी (दि.८) लसीकरणासाठी झालेल्या गर्दीमुळे कोविड-१९ च्या नियमांचा पुरता बोजवारा उडाला होता. त्याची जबाबदारी आरोग्य विभागाची नसून स्थानिक प्रशासनाची असल्याचा आक्षेप तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी घेतला असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे.

शनिवारी तहसीलदार यांनी गर्दीची जबाबदारी झटकत देशात असेच चालले आहे, मी तरी काय करणार अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे नेमकी जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कमी पुरवठ्यामुळे आपला नंबर केव्हा लागतो या आशंकेने धास्तावलेले नागरिक सरकारी बाबूंच्या, चेंडू फळीच्या खेळात वाऱ्यावर सोडले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉ. ससाणे यांनी इतर यंत्रणांनी सहकार्य करावे, अशी भूमिका आता घेतली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोविड-१९ लसीकरण सत्राच्या ठिकाणी होणारी गर्दी हा एक गंभीर रूप धारण करणारा मुद्दा होऊन बसला आहे. लस देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची असली तरी लस घेणाऱ्या लाभार्थींच्या गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी स्थानिय प्रशासनाने स्वीकारली तर गर्दीचे नियोजन होऊ शकते. नगर परिषद प्रशासनाने २०० टोकन नंबर वितरित करून तेवढेच लोक लसीकरणाला हजर राहतील याचे नियोजन करावे. कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देऊन गर्दीचे नियोजन करावे. इतर खात्यातील अधिकारी/कर्मचारी वर्गावर याची जबाबदारी द्यावी. पोलीस प्रशासनाची आवश्यक तेथे मदत घ्यावी. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खच्चीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या भागातच आपले लसीकरण करून घ्यावे. ऑनलाइन रजिस्टेशन करूनच लसीकरण सत्रात यावे या व इतर सूचनांचे जनतेने अनुपालन केले तर शांततेत लसीकरण पार पाडण्यात सहकार्य होईल व हे सहकार्य जनतेकडून अपेक्षित आहे, असे डॉ. अशोक ससाणे यांनी स्पष्ट केलेे.

इन्फो

अनेक जण लसविना माघारी

लसीकरणाच्या दिवशी केंद्रात नागरिकांची व रस्त्यावर दुचाकी वाहनांच्या गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती. आरोग्य कर्मचारी लस घेऊन तब्बल दीड तास उशिराने दाखल झाले. ते ही लसीचे फक्त ७० डोस घेऊन आले. या प्रकारामुळे नागरिकांना विनालस घरी जावे लागले. या घटना टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.