शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कोरोनाने रोखली वारकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:23 IST

अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.

ठळक मुद्देशेकडो दिंड्या : अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड

सायखेडा : अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गावागावांतून हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. रस्त्याच्या कडेने चालणारे वारकरी हातात भगवी पताका, गळ्यात टाळ मृदंग, विठुरायाच्या पादुका असणारी पालखी यासोबतच वारकºयांच्या मधुर कंठातून निघणारे भजनांचे सुरेल स्वर, मजल दरमजल करीत अनेक गावांतून विठुरायाचा गजर दिसणार नसल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला आहे. निफाड तालुक्यातून जाणाºया शेकडो दिंड्या जवळपास वीस दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात. अनेक गावांमध्ये मुक्काम करून त्या गावांमध्ये रात्रीचा कीर्तन सोहळा पार पाडतात. यंदा मात्र हे चित्र पाहायला मिळत नसल्याने वारकरी आणि भाविकांना काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकºयांना यंदा या अमृतमय सोहळ्यापासून दूर राहावे लागणार आहे. म्हणूनच सारे वारकरी कोरोना रोगाचे थैमान थांबावे यासाठी विठुरायाला साकडे घालत आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यंदा राज्यातील सर्वच देवस्थानांची दारे बंद केली आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ सुरू नसून गर्दी टाळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमणारा भाविकांचा महामेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

निफाड तालुक्यातून दरवर्षी पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक जात असतात. यंदा मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे.- चंदू राजोळे, अध्यक्ष, निफाड तालुका वारकरी सांप्रदाय

कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा अनेक वर्षांची परंपरा असणाºया दिंडी प्रथा बंद केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे वारकºयांच्या वतीने स्वागतच आहे. आम्ही वारकरीदेखील प्रतिसाद देत शेकडो वर्षांची परंपरा थांबवत असलो तरी यंदा दिंडीचा सोहळा आणि विठुरायाचे दर्शन होत नसल्याची सल मात्र मनात कायम आहे.- पृथ्वीबाबा शिरसाठ, वारकरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रम