शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनाने रोखली वारकऱ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:23 IST

अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.

ठळक मुद्देशेकडो दिंड्या : अनेक वर्षांची परंपरा खंडित झाल्याने वारकऱ्यांचा हिरमोड

सायखेडा : अवघे अवघे सारे जण! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघणाºया दिंड्यांची वाट कोरोनाने रोखली आहे. जवळपास शंभर वर्षांची परंपरा खंडित झाल्याने निफाड तालुक्यातील शेकडो दिंड्या यंदा जाणार नसल्याने वारकºयांची अखंडतेची परंपरा खंडित होत आहे.आषाढी एकादशीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गावागावांतून हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात. रस्त्याच्या कडेने चालणारे वारकरी हातात भगवी पताका, गळ्यात टाळ मृदंग, विठुरायाच्या पादुका असणारी पालखी यासोबतच वारकºयांच्या मधुर कंठातून निघणारे भजनांचे सुरेल स्वर, मजल दरमजल करीत अनेक गावांतून विठुरायाचा गजर दिसणार नसल्याने भाविक भक्तांचा हिरमोड झाला आहे. निफाड तालुक्यातून जाणाºया शेकडो दिंड्या जवळपास वीस दिवस पायी चालत हे वारकरी पंढरपूरला पोहोचतात. अनेक गावांमध्ये मुक्काम करून त्या गावांमध्ये रात्रीचा कीर्तन सोहळा पार पाडतात. यंदा मात्र हे चित्र पाहायला मिळत नसल्याने वारकरी आणि भाविकांना काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेल्या वारकºयांना यंदा या अमृतमय सोहळ्यापासून दूर राहावे लागणार आहे. म्हणूनच सारे वारकरी कोरोना रोगाचे थैमान थांबावे यासाठी विठुरायाला साकडे घालत आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने यंदा राज्यातील सर्वच देवस्थानांची दारे बंद केली आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ सुरू नसून गर्दी टाळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमणारा भाविकांचा महामेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

निफाड तालुक्यातून दरवर्षी पंढरपूरला पायी दिंडी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक जात असतात. यंदा मात्र शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने खूप काहीतरी चुकल्यासारखे वाटत आहे.- चंदू राजोळे, अध्यक्ष, निफाड तालुका वारकरी सांप्रदाय

कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा अनेक वर्षांची परंपरा असणाºया दिंडी प्रथा बंद केली आहे. शासनाच्या या निर्णयाचे वारकºयांच्या वतीने स्वागतच आहे. आम्ही वारकरीदेखील प्रतिसाद देत शेकडो वर्षांची परंपरा थांबवत असलो तरी यंदा दिंडीचा सोहळा आणि विठुरायाचे दर्शन होत नसल्याची सल मात्र मनात कायम आहे.- पृथ्वीबाबा शिरसाठ, वारकरी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याReligious programmeधार्मिक कार्यक्रम