शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ही संधी मानून भावी पिढीने व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:14 IST

नाशिक : कोरोना काळात जग भारताकडे एक समर्थ पर्याय म्हणून बघत आहे. त्यामुळे कोरोना ही संधी समजून भावी पिढीने ...

नाशिक : कोरोना काळात जग भारताकडे एक समर्थ पर्याय म्हणून बघत आहे. त्यामुळे कोरोना ही संधी समजून भावी पिढीने व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन भारतीय उद्योग महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी केले.

उद्योग क्षेत्रातील आव्हाने आणि संधी या विषयावर ते बोलत होते. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत स्व. निर्मला दातार स्मृती व्याख्यानात बारावे पुष्प मुतालिक यांनी गुंफले. कोरोना काळात अडचणी अनेक असल्या तरी उद्योगांसाठी आशादायक चित्र आहे. कोरोना एक गतिरोधक असून तो कधीतरी संपणारच आहे. भारतीय उद्योजक रडत किंवा गाऱ्हाणे गात बसत नाहीत, असेही मुतालिक यांनी नमूद केले. १४० कोटींच्या देशात मागणीचा तुटवडा नाही. लोकसंख्या हे उद्योगांचे बलस्थान असून आपण दृष्टिकोन बदलायला हवा. उद्योजकता,उद्यमशीलता भारतीयांच्या रक्तात असून, ती प्राचीन काळापासून चालत आली आहे. म्हणूनच कोरोना हे उद्योगजगतासमोरील आव्हान असू शकत नाही, असे ठाम मत सुधीर मुतालिक यांनी व्यक्त केले. भारतावर अनेक आक्रमणे झाली. समाज म्हणून मोठी पडझड झालीही असेल. इंग्रजांनी तर कणा मोडण्याचाही प्रयत्न केला. पण उद्योग जिवंत राहिला.

आज माणूस माणसाला भेटू शकत नाही. पण कोरोनाने मोठी संधी उद्योग क्षेत्रात निर्माण केली. कोरोनामुळे मागणी कमी झाली नसून पुरवठा तितकाच होतोय. फक्त सेवा देण्याची, उत्पादन करण्याची पद्धत बदलावी लागेल, असेही मुतालिक यांनी सूचित केले. भावी पिढीने गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. कारण हीच राष्ट्राची गरज असल्याचे मुतालिक म्हणाले. याप्रसंगी मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

फोटो

१२मुतालिक