शहरं
Join us  
Trending Stories
1
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
4
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
5
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
6
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
7
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
8
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
9
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
10
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
11
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
12
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
13
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
14
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
15
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
16
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
17
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
18
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
19
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
20
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर

कोरोना पॉझिटिव्हिटी दर पुन्हा वाढतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:18 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग जुलै महिन्याच्या प्रारंभापासून महिनाभर मंदावला होता. मात्र, ३१ जुलैला १ च्या आसपास असलेला ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनावाढीचा वेग जुलै महिन्याच्या प्रारंभापासून महिनाभर मंदावला होता. मात्र, ३१ जुलैला १ च्या आसपास असलेला कोरोना वृद्धीचा पॉझिटिव्हिटी दर या आठवड्याच्या उत्तरार्धात अडीच टक्क्यांपर्यंत म्हणजेच सुमारे दुपटीहून अधिक वाढू लागला आहे. त्यामुळे महिनाभरापासून मंदावत चाललेले कोरोना रुग्णांचे प्रमाण निर्बंध शिथिलतेनंतर तत्काळ वाढू लागल्यासारखे भासत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण जुलै महि्न्यापासून सर्वाधिक वेगाने घटले होते. जुलै महिन्याच्या प्रारंभी कोरोना उपचारार्थी रुग्णांची संख्या २४४३ इतकी होती. त्यानंतर जवळपास महिनाभरात कोरोनाचे नवीन रुग्ण कमी आणि कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण बहुतांश वेळा अधिक राहिल्याने एकूण उपचारार्थी संख्या ३१ जुलैपर्यंत ११०५ इतकी खाली आली होती. त्यामुळे आता ऑगस्टमध्ये याच वेगाने कमी होत गेल्यास कोरोनाची उपचारार्थी संख्या निम्म्याहून अधिक कमी होण्याची अपेक्षा होती. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनामुक्त आणि नवीन बाधित प्रमाण एकतर जवळपास समान किंवा काही वेळा तर बाधितांची संख्या अधिक राहू लागल्याने एकूण उपचारार्थी संख्या त्यानंतर तेरा दिवसांनीदेखील १,१२७ वर आहे. गत पंधरवड्यात एकूण उपचारार्थी संख्या १०५० पर्यंतदेखील गेली. मात्र, हजाराच्या खाली न उतरता पुन्हा अकराशेवरच राहिली आहे. सध्या उपचारार्थी संख्या घटवून कोरोनाचे नवीन रुग्ण कमी यावेत यावरच भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

इन्फो

पॉझिटिव्हिटी दर १ वरून २.३० टक्के

जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध काहीसे शिथिल करण्यास दोन आठवडे आठवड्यांचा कालावधी उलटून गेला आहे. नेमका तेवढ्याच कालावधीत कोरोनाबाधितांचा दर वाढू लागल्याने हा वाढता दर चिंतेचे कारण ठरत आहे. १ ऑगस्टला पॉझिटिव्हिटी दर हा १ टक्क्याच्या आसपास होता. तोच पॉझिटिव्हिटी दर ८ ऑगस्टला १.५ टक्क्यांपर्यंत वाढला. तर दोन आठवड्यांत म्हणजेच १३ ऑगस्टला २.३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

इन्फो

मृत्युदरात वाढ नसल्याचा दिलासा

कोरोनाचे रुग्ण तसेच पॉझिटिव्हिटी रेटमध्ये काहीशी वाढ होत असताना जिल्ह्यात गत पंधरवड्यात साधारणपणे २ ते ४ नागरिकांचे मृत्यू होत आहेत. या मृत्युदरात वाढ झालेली नाही, हाच काहीसा दिलासा आहे. त्यामुळे अजून पॉझिटिव्हिटी रेट वाढला तरी किमान मृत्युदरात वाढ होऊ न देण्याची दक्षता आरोग्य विभागाला बाळगावी लागणार आहे.

---------------------

पान दोनसाठी मेन बातमी