शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तमाशातील अप्सरांच्या माथी उपेक्षाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:38 IST

मनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गिरीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : सध्या ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू असून, या कालावधीत ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात यात्राच भरल्या नाही. परिणामी सर्वत्र तमाशाचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.तमाशातील लावणी नाट्यगृहात आली म्हणून तमासगिरांचे दिवस बदलले नाही. आजही हे कलावंत आभाळाच्या तंबूखाली संसार मांडून तमाशा ही कला जिवंत ठेवत आहे. लावणीचे कार्यक्रम नाट्यगृहात सुरू झाले, मात्र पारंपरिक तमाशा करणाऱ्यांच्या नशिबाच्या दुर्दैवाचे दशावतार काही संपले नाही. चैत्र महिन्यात गावागोवी यात्रा जत्रांचा हंगाम सुरूअसतो. अनेक ठिकाणी हे कलावंत आपली कला सादर करण्यासाठी गावोगावच्या सुपारीची वाट पाहतात. एप्रिल व मे अशा दोन महिन्यांत साधारण ४७ ते ४८ यात्रांच्या तिथी येतात. यावर्षी कोरोनामुळे अनेक गावांमधे यात्रा भरल्याच नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत खर्च वाढला असला तरी व्यवसाय नसल्याने अगदी अल्प मानधनाच्या सुपारीवर कलाकार कार्यक्रम करण्यास तयार असले तरी त्यांना काम मिळू शकले नाही. ग्रामीण भागातील यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्याने ज्यांनी अर्धपोटी राहून प्रसंगी उपाशी राहून ही कला जागविली त्यांच्या नशिबी घोर उपेक्षा आली आहे.---------------आमच्या सोपान कोळी लोकनाट्य तमाशा मंडळाचा शेवटचा कार्यक्रम १२ मार्चला सायगाव येथे झाला होता. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटामधे कलाकारांना मदत करण्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा.- सोपान कोळी दोनगावकर,तमाशा कलावंत----------------कोरोनाच्या संकटामुळे तमाशाचे कार्यक्रम रद्द झाले आहे. वर्षभरातील सुगीचा काळ म्हणून ओळखल्या जाणाºया यात्रांच्या हंगामामध्येच तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीणप्रसंगी फडातील कलाकारांना धान्य व किराणा वाटप करण्यात आले. या संकटातून देश वाचविण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे- राणी पाटील पैठणकर, तमाशा कलावंत

टॅग्स :Nashikनाशिक