शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

५० आदिवासी पाड्यांत कोरोनाचा शिरकाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:14 IST

पश्चिम भागात पहिल्या लाटेत ननाशी या बाजारपेठेचे गाव वगळता अन्य ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता व आताही किरकोळ अपवाद ...

पश्चिम भागात पहिल्या लाटेत ननाशी या बाजारपेठेचे गाव वगळता अन्य ठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता व आताही किरकोळ अपवाद वगळता बहुतांशी गावांत कोरोनाला रोखण्यास येथील नागरिक यशस्वी झाले आहेत. यातील बहुतांशी गावांची लोकसंख्या एक हजारापेक्षा कमी आहे. या गावांमधील बहुतांशी नागरिक शेतमजूर असून, नियमांच्या पालनासोबतच गावातील स्वच्छता, ग्रामपंचायतीतर्फे औषध फवारणीचा फायदा झाला आहे. नुकत्याच झालेल्या होळी सणानिमित्त अनेक पूर्वभागात द्राक्ष बागांच्या कामासाठी स्थलांतरित शेतमजूर गावी येऊन पुन्हा कामावर परतले आहेत. तालुक्यात बाहेरगावी नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण काहीसे कमी असले तरी हजार, दीड हजार नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, आदी ठिकाणी आहेत. सुरुवातीच्या काळातही स्थलांतरित कामगार, नोकरवर्ग यांच्याबाबत गावी आल्यास वस्तीवर राहण्यास भाग पाडले गेले होते; मात्र कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर त्याबाबत तशी काळजी घेतली गेलेली नसली तरी कुणी बाहेरून आल्यास त्यांच्या तब्बेतीवर लक्ष मात्र ठेवले जात होते.

गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलत त्या नुकत्याच पार पडल्या. त्यावेळी कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले. मात्र, त्यास कुणीही मनावर घेतले नाही. आज त्याच काही गावांत कोरोना रुग्ण आहेत. मध्यंतरीच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंग व मास्कबाबत कुणीही गंभीर नव्हते. लग्न सोहळे यासह विविध कार्यक्रम, राजकीय मेळावे मोठ्या थाटात पार पडले; मात्र पुन्हा कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने गावोगाव विविध उपाययोजना होत आहे. मास्क वापराचे प्रमाण वाढले असून, अडगळीत पडलेले सॅनिटायझर पुन्हा बाहेर आले आहे. नागरिक काळजी घेताना दिसत असले तरी काही कार्यक्रमांत फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.